शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तिसरा डोळा नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:17 IST

नांदेड: पुणे येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली होती़ त्यात नांदेड शहराने सुरक्षित शहर म्हणून मान पटकावण्याच्या नादात त्यावेळी पाच कोटी रुपये खर्च करुन तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते़ परंतु या कॅमेºयाची देखभाल आणि दुरुस्तीवर होणाºया खर्चामुळे यातील अर्ध्याहून अधिक कॅमेरे बंदच राहत असून बसविण्यात आलेला हा तिसरा डोळा नावालाच उरला आहे़ सुरुवातीला अनेक गुन्हे उघडकीस आणण्याकामी या कॅमेºयांचा उपयोग झाला़ आता मात्र सर्रासपणे भर रस्त्यावर चोरीच्या घटना घडत आहेत़

ठळक मुद्देपाच कोटींचा खर्च : बसविले होते १०० सीसीटीव्ही कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पुणे येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली होती़ त्यात नांदेड शहराने सुरक्षित शहर म्हणून मान पटकावण्याच्या नादात त्यावेळी पाच कोटी रुपये खर्च करुन तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते़ परंतु या कॅमेºयाची देखभाल आणि दुरुस्तीवर होणाºया खर्चामुळे यातील अर्ध्याहून अधिक कॅमेरे बंदच राहत असून बसविण्यात आलेला हा तिसरा डोळा नावालाच उरला आहे़ सुरुवातीला अनेक गुन्हे उघडकीस आणण्याकामी या कॅमेºयांचा उपयोग झाला़ आता मात्र सर्रासपणे भर रस्त्यावर चोरीच्या घटना घडत आहेत़सेफसिटी प्रकल्पातून शहरात १०० कॅमेरे बसविण्यात आले होते़ या सर्व कॅमेºयांचे नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातून होते़ त्यामुळे शहरात येणारे प्रत्येक वाहन, मुख्य रस्त्यावरील प्रत्येक हालचालींना टिपणे पोलिसांना सोपे झाले होते़ जिथे सूचना देण्याची गरज असे तिथे त्वरित सूचनाही देता येत होत्या़ अवघ्या ११ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला़या कॅमेºयांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विविध उत्सव, कार्यक्रम, गुन्हे व वाहतूक नियंत्रण, आपात्कालीन परिस्थितीत सूचना प्रसारणाचे काम प्रभावीपणे करता येणार होते़ परंतु या कॅमेºयाच्या दुरुस्ती आणि देखभालीवरुन मनपा आणि पोलीस प्रशासनामध्ये मध्यंतरी वाद उद्भवला होता़ त्यानंतर गणेशोत्सव, निवडणुका, इतर धार्मिक उत्सव अशा महत्त्वाच्या प्रसंगी त्या-त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेºयांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत होती़ परंतु आजघडीला निम्म्याहून अधिक कॅमेरे बंदच आहेत़शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून वाहनचालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत़ परंतु या कॅमेºयांच्या मदतीने त्याबाबत कुठलीही कारवाई करण्यात येत नाही़ जवळपास तीन किमीपर्यंत होणारी प्रत्येक हालचाल टिपण्याची क्षमता असलेले हे कॅमेरे सध्या शोभेची वस्तू ठरत आहेत़शहरातील मुख्य रस्त्यावरुन गेल्या काही दिवसांत बॅग, मंगळसूत्र पळविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ त्यामुळे मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या या सेफसिटी प्रकल्पाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे़या कॅमेºयांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे़ अन्यथा येत्या काही दिवसांत उरले-सुरले कॅमेरेही बंद पडतील़