शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

'ते नाहीत चोर, संजय राऊतने करु नये शोर'; रामदास आठवलेंचा खास शैलीत टोला

By शिवराज बिचेवार | Updated: March 1, 2023 15:52 IST

''मी इथे असताना राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही. विनाकारण जास्त गर्दी करुन उपयोग नाही.''

नांदेड- ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खास चारोळीच्या स्टाईलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला. ते नाहीत चोर, संजय राऊतने करु नये शोर, असे म्हणत त्यांनी कोण चोर आहेत अन् कोण तुरुंगात जाऊन आले हे सर्वांना माहित आहे असा टोला लगाविला.

दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नांदेडात आयोजित कार्यक्रमासाठी बुधवारी आठवले आले होते. यावेळी ते म्हणाले, ठाकरे यांना सोडून गेलेले ते चाळीस आमदार हिम्मतवाले आहेत. न्यायालयाचा निर्णयही त्या आमदारांच्या बाजूनेच लागेल. शिवसेना ही शिंदेचीच आहे. ठाकरे यांना आता शिवसेना नाव आणि चिन्हही वापरता येणार नाही. ही वेळ स्वताहा ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओढावून घेतली. युतीत निवडणुका लढवून त्यांनी भाजपला आणि आम्हाला धोका दिला. कवाडे हे शिंदे गटात गेल्याबाबत आम्हाला नाराजी नाही. परंतु एकवेळेस आमच्याशी चर्चा करण्याची गरज होती. राज ठाकरे यांना सोबत घेण्यास मात्र आमचा विरोध आहे. मी इथे असताना राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही. विनाकारण जास्त गर्दी करुन उपयोग नाही. अशी मिष्कील टिपणीही त्यांनी केली. 

वंचितचा प्रभाव पडणार नाही वंचितचे प्रकाश आंबडेकर हे ठाकरे गटासोबत गेले. त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे. मी जेव्हा गेलो होतो तेव्हाच त्यांनी यायला पाहिजे होते. मुंबई महापालिका निवडणुकीतही वंचितचा फारसा प्रभाव पडेल असे वाटत नाही. फार तर अकोला जिल्ह्यात फायदा होवू शकतो असेही आठवले म्हणाले. यावेळी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम, गौतम सोनवणे, विजय सोनवणे, महानगराध्यक्ष धम्मपाल धूताडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNandedनांदेड