शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

महात्मा बसवण्णांनंतर कोणीही जगद्गुरू नाही : अरविंद जत्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:19 IST

बैठकीत आगामी जनगणनेत सर्वांनी लिंगायत धर्म असा आवर्जून उल्लेख करावा, असा ठराव करण्यात आला़

ठळक मुद्देलिंगायत समिती चिंतन बैठक

नांदेड : फक्त जातीने, धर्माने लिंगायत असून चालत नाही तर आपल्या कर्माने आणि आचरणाने लिंगायत असण्याची गरज आहे़ ईश्वराचे प्रतीक असलेल्या इष्टलिंगाला जो आयात करतो तोच लिंगायत होईल. तसेच विश्वगुरू महात्मा बसवण्णा हेच या जगताचे गुरू आहेत़ त्यांच्यानंतर कोणीही जगद्गुरु होऊ शकत नाही़ आपण फक्त त्यांचे कार्य, विचारांचा प्रसार करू शकतो, असे प्रतिपादन चिंतन बैठकीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी केले़

नांदेड येथील अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती चिंतन बैठकीत ते बोलत होते़ रविवारी बैठकीचे उद्घाटन कुलगुरु डॉ़ उद्धव भोसले यांनी केले़ यावेळी बसव मंच समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चन्नबसवानंद महास्वामी, डॉ. व्ही़ एस. शेटे, बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर, माधवराव पाटील टाकळीकर, माधवराव पंडागळे, अशोक मुस्तापुरे, नरेश दरगू, विनोद कांचनगिरे, आनंद कर्णे उपस्थित होते.चन्नबसवानंद  महास्वामी  यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

‘जनगणनेत धर्माचा उल्लेख करा’बैठकीत आगामी जनगणनेत सर्वांनी लिंगायत धर्म असा आवर्जून उल्लेख करावा, असा ठराव करण्यात आला़ या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील प्रतिनिधी उपस्थित होते. ़ 

अध्ययन केंद्र सुरू करणारकुलगुरु डॉ़ उद्धव भोसले म्हणाले, चिंतन शिबिराचा फायदा समाजातील सर्वच घटकांना व्हावा, यासाठी प्रयत्न करावे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार व साहित्य समाजासाठी अतिशय उपयुक्त असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात लवकरच महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र सुरू करणार आहे. यासाठीच सर्व प्रशासकीय ठराव करून प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक