शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

...तर काशीपर्यंत पदयात्रा काढून 'काशी' झाल्याचे सांगावे; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 16:25 IST

फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली.

नांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे महाआघाडी सरकारकडून भ्रमनिरास झाला असल्यास राजू शेट्टी (Raju Shetty )  यांनी काशीपर्यंत पदयात्रा काढून महाआघाडीत येऊन आपली काशी करून घेतल्याचे सांगावे, असा सल्ला रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी दिला. आमदारकीच्या यादीतून नाव गळल्यानंतर शेट्टी यांनी करेक्ट कार्यक्रम करणार या प्रतिक्रियेवर खोत बोलत होते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी दिलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपालांचा आक्षेप असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचे यादीतील नाव वगळ्याची चर्चा आहे. या प्रकारावर राजू शेट्टी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशाराच दिला आहे. यावर आता सदाभाऊ खोत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली. आता म्हणे ते जलसमाधी घेणार आहेत, एक दोन दिवसात ते जलसमाधी घेणार आहेत. पाहू काय होते ते. शेट्टी हे एनडीए प्रवेश करतील काय या प्रश्नावर खोत म्हणाले, त्यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा निर्णय आहे. आतापर्यंत किती पक्ष झाले अन कोणते राहिले याची यादी त्यांच्याकडे असेलच. करेक्ट कार्यक्रम हे उद्गार अपयश आणि उद्विग्नता यातून आले आहेत.

राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप  राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, राजू शेट्टी यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेस