शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

...तर काशीपर्यंत पदयात्रा काढून 'काशी' झाल्याचे सांगावे; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 16:25 IST

फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली.

नांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे महाआघाडी सरकारकडून भ्रमनिरास झाला असल्यास राजू शेट्टी (Raju Shetty )  यांनी काशीपर्यंत पदयात्रा काढून महाआघाडीत येऊन आपली काशी करून घेतल्याचे सांगावे, असा सल्ला रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी दिला. आमदारकीच्या यादीतून नाव गळल्यानंतर शेट्टी यांनी करेक्ट कार्यक्रम करणार या प्रतिक्रियेवर खोत बोलत होते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी दिलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपालांचा आक्षेप असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचे यादीतील नाव वगळ्याची चर्चा आहे. या प्रकारावर राजू शेट्टी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशाराच दिला आहे. यावर आता सदाभाऊ खोत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली. आता म्हणे ते जलसमाधी घेणार आहेत, एक दोन दिवसात ते जलसमाधी घेणार आहेत. पाहू काय होते ते. शेट्टी हे एनडीए प्रवेश करतील काय या प्रश्नावर खोत म्हणाले, त्यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा निर्णय आहे. आतापर्यंत किती पक्ष झाले अन कोणते राहिले याची यादी त्यांच्याकडे असेलच. करेक्ट कार्यक्रम हे उद्गार अपयश आणि उद्विग्नता यातून आले आहेत.

राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप  राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, राजू शेट्टी यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेस