शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

महायुती अन् महाविकास आघाडीच्या घमासानमध्ये राज्यात शेतकरी नेत्यांची तिसरी आघाडी

By शिवराज बिचेवार | Updated: July 15, 2024 13:36 IST

शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तिसरी आघाडी

नांदेड : राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडीत घमासान सुरू असताना शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता राज्यभरातील शेतकरी नेत्यांनी तिसरी आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात अनेक शेतकरी संघटनांचे नेते, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या मंडळींची येत्या १८ जुलै रोजी पुणे येथे बैठक होणार आहे.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात महायुतीत भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. तर दुसरीकडे विरोधी बाकावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्यात सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात उलथा-पालथी झाल्या. फोडाफोडीच्या राजकारणाला तर ऊत आला आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हे कळायला मार्ग नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी यासारखे जिव्हाळ्याचे विषय मागे पडले आहेत.

एकेकाळी राज्याच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविणाऱ्या शेतकरी संघटनेची शकले पडली आहे. प्रत्येकाने वेगळी चूल मांडली असली तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र कायम ते आवाज उठवित असतात. त्यामुळे आता या सर्व मंडळींना एकाच छताखाली आणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी माजी आमदार शंकर धोंडगे, वामनराव चटप, रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी चळवळ आणि सामाजिक संघटनांतील अनेकांची येत्या १८ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा सक्षम पर्याय देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असण्याची दाट शक्यता आहे.

एकाच मुशीतून सर्वजण घडलेलेशेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांवर सातत्याने त्या-त्या भागात आवाज उठविणारे वेगवेगळ्या पक्षातील, संघटनेतील नेते हे एकाच मुशीतून घडलेले आहेत. सध्याच्या फोडाफोडीच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. त्यामुळे एक भूमिका घेऊन आम्ही तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत आहोत. राज्यात तेलंगणाचे विकासाचे मॉडेल आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने तेलंगणात बीआरएसचा पराभव झाला. आता बीआरएससोबत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणार्या मंडळींना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.- माजी आमदार शंकर धोंडगे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Nandedनांदेड