शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महायुती अन् महाविकास आघाडीच्या घमासानमध्ये राज्यात शेतकरी नेत्यांची तिसरी आघाडी

By शिवराज बिचेवार | Updated: July 15, 2024 13:36 IST

शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तिसरी आघाडी

नांदेड : राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडीत घमासान सुरू असताना शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता राज्यभरातील शेतकरी नेत्यांनी तिसरी आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात अनेक शेतकरी संघटनांचे नेते, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या मंडळींची येत्या १८ जुलै रोजी पुणे येथे बैठक होणार आहे.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात महायुतीत भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. तर दुसरीकडे विरोधी बाकावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्यात सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात उलथा-पालथी झाल्या. फोडाफोडीच्या राजकारणाला तर ऊत आला आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हे कळायला मार्ग नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी यासारखे जिव्हाळ्याचे विषय मागे पडले आहेत.

एकेकाळी राज्याच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविणाऱ्या शेतकरी संघटनेची शकले पडली आहे. प्रत्येकाने वेगळी चूल मांडली असली तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र कायम ते आवाज उठवित असतात. त्यामुळे आता या सर्व मंडळींना एकाच छताखाली आणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी माजी आमदार शंकर धोंडगे, वामनराव चटप, रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी चळवळ आणि सामाजिक संघटनांतील अनेकांची येत्या १८ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा सक्षम पर्याय देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असण्याची दाट शक्यता आहे.

एकाच मुशीतून सर्वजण घडलेलेशेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांवर सातत्याने त्या-त्या भागात आवाज उठविणारे वेगवेगळ्या पक्षातील, संघटनेतील नेते हे एकाच मुशीतून घडलेले आहेत. सध्याच्या फोडाफोडीच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. त्यामुळे एक भूमिका घेऊन आम्ही तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत आहोत. राज्यात तेलंगणाचे विकासाचे मॉडेल आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने तेलंगणात बीआरएसचा पराभव झाला. आता बीआरएससोबत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणार्या मंडळींना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.- माजी आमदार शंकर धोंडगे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Nandedनांदेड