शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

महायुती अन् महाविकास आघाडीच्या घमासानमध्ये राज्यात शेतकरी नेत्यांची तिसरी आघाडी

By शिवराज बिचेवार | Updated: July 15, 2024 13:36 IST

शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तिसरी आघाडी

नांदेड : राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडीत घमासान सुरू असताना शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता राज्यभरातील शेतकरी नेत्यांनी तिसरी आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात अनेक शेतकरी संघटनांचे नेते, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या मंडळींची येत्या १८ जुलै रोजी पुणे येथे बैठक होणार आहे.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात महायुतीत भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. तर दुसरीकडे विरोधी बाकावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्यात सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात उलथा-पालथी झाल्या. फोडाफोडीच्या राजकारणाला तर ऊत आला आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हे कळायला मार्ग नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी यासारखे जिव्हाळ्याचे विषय मागे पडले आहेत.

एकेकाळी राज्याच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविणाऱ्या शेतकरी संघटनेची शकले पडली आहे. प्रत्येकाने वेगळी चूल मांडली असली तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र कायम ते आवाज उठवित असतात. त्यामुळे आता या सर्व मंडळींना एकाच छताखाली आणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी माजी आमदार शंकर धोंडगे, वामनराव चटप, रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी चळवळ आणि सामाजिक संघटनांतील अनेकांची येत्या १८ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा सक्षम पर्याय देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असण्याची दाट शक्यता आहे.

एकाच मुशीतून सर्वजण घडलेलेशेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांवर सातत्याने त्या-त्या भागात आवाज उठविणारे वेगवेगळ्या पक्षातील, संघटनेतील नेते हे एकाच मुशीतून घडलेले आहेत. सध्याच्या फोडाफोडीच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. त्यामुळे एक भूमिका घेऊन आम्ही तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत आहोत. राज्यात तेलंगणाचे विकासाचे मॉडेल आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने तेलंगणात बीआरएसचा पराभव झाला. आता बीआरएससोबत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणार्या मंडळींना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.- माजी आमदार शंकर धोंडगे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Nandedनांदेड