शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीमुळे नांदेड जिल्ह्यातील 'स्थानिक' गणित बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:08 IST

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह: सोशल मीडियावर कुठे टीका, तर कुठे योग्य वेळी योग्य निर्णयाचा सूर

- श्रीनिवास भोसलेनांदेड :  महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना संभाजी ब्रिगेड मागील काही वर्षांपासून राजकीय पर्याय म्हणून उभी राहिली आहे. त्यात शिंदे गटामुळे शिवसेनेला पडलेली खिंडार भरून काढण्यासाठी आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. तसेच आगामी सर्वच निवडणुका सोबत लढणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गणितं देखील बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपंचायतीमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यात अनेक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. भविष्यात राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी झाली तर संभाजी ब्रिगेडला ही संधी मिळेल. दरम्यान, नांदेड जिल्हा परिषदेत सर्वाधिक २८ सदस्य काँग्रेसचे होते. त्याचबरोबर शिवसेनेचे १०, भाजपचे १३, राष्ट्रवादी- १०, रासप आणि अपक्ष प्रत्येकी एक असे एकूण ६३ सदस्य होते.  

राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, जिल्ह्यातील एकमेव आमदार बालाजी कल्याणकर, दोन जिल्हा प्रमुखांसह १४ तालुकाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिकांनी शिंदे गटाशी जवळीक केली.त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेड सोबत युती झाल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड सह मराठा सेवा संघाच्या सर्वच ३३ कक्षांनी एकजुटीने काम केले तर निश्चित नांदेडातील राजकीय गणितं  बदलतील.

चळवळीतून अनेक गावांत परिवर्तनसंभाजी ब्रिगेडने सामाजिक संघटना म्हणून काम करत असताना गावा-गावात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैचारिक चळवळ उभी केली. आजही बहुतांश गावात संभाजी ब्रिगेडने रूजविलेल्या विचारांचा पगडा पहायला मिळत आहे. त्यात जिजाऊ ब्रिगेडचा देखील महत्वपूर्ण वाटा आहे. दरम्यान, राजकीय पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेडची घोषणा केल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांनी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणे पसंत केले. तर शिवराज्य पक्ष असताना संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष म्हणून घोषित केल्याने अनेकांनी संघटनेला रामराम देखील ठोकला होता.वैचारिक बैठक झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात आजही मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिलेले विचार कायम असल्याचे दिसून येते.

संभाजी ब्रिगेडने अनेकांना घडविलेसंभाजी ब्रिगेडच्या सामाजिक आंदोलनामध्ये नांदेडचा मोठा वाटा आहे. ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना चांदोजी सूर्यवंशी, माधव पावडे, विठ्ठल पावडे, संतोष गव्हाणे, धनंजय सूर्यवंशी यांनी गावा-गावात कार्यकर्त्यांची वैचारिक फळी निर्माण केली. त्यामुळे नांदेड उत्तर आणि अर्धापूर तालुक्यातील बहुतांश गावात संभाजी ब्रिगेडचे राजकीय वर्चस्व आज सिद्ध झाले आहे.

घरवापसीसाठी प्रयत्न करणे गरजेचेकार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारून अनेकजण इतर राजकीय पक्षांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे मुळ संभाजी ब्रिगेडचे विचार डोक्यात ठेवून इतर पक्षात काम करणाऱ्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न होणेही गरजेचे आहे.

टॅग्स :Nandedनांदेडsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडPoliticsराजकारण