शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

‘शक्तिपीठ’वरून दोन भागांत जुंपली, विदर्भातील समर्थनार्थ, तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 05:18 IST

दोन्हीकडील शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलनाचे केंद्र नांदेडच निवडले आहे.

शिवराज बिचेवार

नांदेड : नागपूर-गाेवा ८०२ किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गावरून सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये जुंपली आहे. विदर्भातील शेतकरी या महामार्गाच्या समर्थनार्थ, तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले आहेत. दोन्हीकडील शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलनाचे केंद्र नांदेडच निवडले आहे. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने दोन्ही भागांतील शेतकरी संभ्रमात आहेत. तर, दुसरीकडे महायुतीतील लोकप्रतिनिधींमध्येही एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे.

समृद्धी महामार्गापेक्षाही अधिक लांबीचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून तो जाणार आहे. सुरुवातीला ७६० किलोमीटरचा असलेला हा महामार्ग आता ८०२ किलोमीटरचा होणार आहे.

विरोध कशामुळे ?

शक्तिपीठ महामार्ग सुपीक जमिनीतून जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहिन होतील, असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सतीश कुलकर्णी म्हणाले.

समर्थन का?

महामार्गामुळे विदर्भात ८ मोठे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे उद्योगधंदे येतील अन् सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असे महामार्ग समर्थन कृती समितीचे अध्यक्ष संजय ढोले म्हणाले.

महामार्गाला कोणाचाही विरोध नाही. ज्यांचा विरोध आहे त्यांना घेऊन आमदार माझ्याकडे येणार आहेत. चर्चा करू निर्णय घेऊ, परंतु महामार्ग होणारच आहे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ज्या ठिकाणी विरोध होत असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू. समृद्धीलाही सुरुवातीला विरोध झाला, नंतर शेतकऱ्यांनी स्वत:हून आपल्या जमिनी दिल्या.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री