शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘शक्तिपीठ’वरून दोन भागांत जुंपली, विदर्भातील समर्थनार्थ, तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 05:18 IST

दोन्हीकडील शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलनाचे केंद्र नांदेडच निवडले आहे.

शिवराज बिचेवार

नांदेड : नागपूर-गाेवा ८०२ किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गावरून सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये जुंपली आहे. विदर्भातील शेतकरी या महामार्गाच्या समर्थनार्थ, तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले आहेत. दोन्हीकडील शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलनाचे केंद्र नांदेडच निवडले आहे. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने दोन्ही भागांतील शेतकरी संभ्रमात आहेत. तर, दुसरीकडे महायुतीतील लोकप्रतिनिधींमध्येही एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे.

समृद्धी महामार्गापेक्षाही अधिक लांबीचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून तो जाणार आहे. सुरुवातीला ७६० किलोमीटरचा असलेला हा महामार्ग आता ८०२ किलोमीटरचा होणार आहे.

विरोध कशामुळे ?

शक्तिपीठ महामार्ग सुपीक जमिनीतून जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहिन होतील, असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सतीश कुलकर्णी म्हणाले.

समर्थन का?

महामार्गामुळे विदर्भात ८ मोठे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे उद्योगधंदे येतील अन् सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असे महामार्ग समर्थन कृती समितीचे अध्यक्ष संजय ढोले म्हणाले.

महामार्गाला कोणाचाही विरोध नाही. ज्यांचा विरोध आहे त्यांना घेऊन आमदार माझ्याकडे येणार आहेत. चर्चा करू निर्णय घेऊ, परंतु महामार्ग होणारच आहे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ज्या ठिकाणी विरोध होत असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू. समृद्धीलाही सुरुवातीला विरोध झाला, नंतर शेतकऱ्यांनी स्वत:हून आपल्या जमिनी दिल्या.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री