शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार, पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:22 IST

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते- १.दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा होतात, त्याचप्रमाणे परीक्षा घेणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षभर विद्यार्थ्यांना ...

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते- १.दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा होतात, त्याचप्रमाणे परीक्षा घेणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतानाही अनेकांना या अडचणींचा सामना करावा लागला असता. - चंद्रप्रकाश गायकवाड, नांदेड

२. कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता दहावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा वातावरणात परीक्षेला कसे पाठवायचे, याची भीती पालकांना आहे. - मनोहर कवडे, नांदेड.

३. विद्यार्थ्यांसाठी हे वर्षच खूप कठीण गेले आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारेच ठरले आहे. सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविण्यात आला; परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे अनेकांचे समाधान झाले नाही. तसेच अभ्यासक्रमही पूर्ण झाला नाही. - अशोक उफाडे

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते.

१.परीक्षा केंद्रावर होणारी विद्यार्थ्यांची गर्दी तसेच आपल्याकडे असलेल्या सुविधांचा अभाव, यामुळे नक्कीच पालकांना भीती वाटत आहे. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. आता कोरोनामुळे हे नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. - गंगाधर गायकवाड, नांदेड

२. शाळांचे वर्ग तसेच खाजगी शिकवण्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च अनेक कठीण वाटणारे प्रकरणे सोडवावी लागली. त्यामुळे परीक्षा कशाही झाल्या तरी विद्यार्थ्यांना त्या द्याव्याच लागणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लेखी परीक्षाच महत्त्वाच्या आहेत. - सीमा बुक्तरे, सिद्धांतनगर, नांदेड.

३. शिक्षणमंत्र्यांनी ऑफलाइन परीक्षा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. कारण लेखी परीक्षेद्वारेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात येते. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आला तो योग्यच आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाला न घाबरता परीक्षेला सामोरे जावे.- सुनील लोंढे