शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार, पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:22 IST

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते- १.दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा होतात, त्याचप्रमाणे परीक्षा घेणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षभर विद्यार्थ्यांना ...

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते- १.दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा होतात, त्याचप्रमाणे परीक्षा घेणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतानाही अनेकांना या अडचणींचा सामना करावा लागला असता. - चंद्रप्रकाश गायकवाड, नांदेड

२. कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता दहावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा वातावरणात परीक्षेला कसे पाठवायचे, याची भीती पालकांना आहे. - मनोहर कवडे, नांदेड.

३. विद्यार्थ्यांसाठी हे वर्षच खूप कठीण गेले आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारेच ठरले आहे. सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविण्यात आला; परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे अनेकांचे समाधान झाले नाही. तसेच अभ्यासक्रमही पूर्ण झाला नाही. - अशोक उफाडे

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते.

१.परीक्षा केंद्रावर होणारी विद्यार्थ्यांची गर्दी तसेच आपल्याकडे असलेल्या सुविधांचा अभाव, यामुळे नक्कीच पालकांना भीती वाटत आहे. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. आता कोरोनामुळे हे नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. - गंगाधर गायकवाड, नांदेड

२. शाळांचे वर्ग तसेच खाजगी शिकवण्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च अनेक कठीण वाटणारे प्रकरणे सोडवावी लागली. त्यामुळे परीक्षा कशाही झाल्या तरी विद्यार्थ्यांना त्या द्याव्याच लागणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लेखी परीक्षाच महत्त्वाच्या आहेत. - सीमा बुक्तरे, सिद्धांतनगर, नांदेड.

३. शिक्षणमंत्र्यांनी ऑफलाइन परीक्षा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. कारण लेखी परीक्षेद्वारेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात येते. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आला तो योग्यच आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाला न घाबरता परीक्षेला सामोरे जावे.- सुनील लोंढे