शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? ...

ठळक मुद्दे पंचायत समितीवर घागरमोर्चा दोन महिन्यांपासून पाणीटंचाई; गटविकास अधिका-यांना विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? सरपंच, ग्रामसेवक लक्ष देत नाहीत, नळपट्टी ,घरपट्टी देतो़ मग गावात पाणी का मिळत नाही? आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, मूलभूत सुविधा गावात मिळत नसतील तर ग्रामपंचायत कोणत्या कामाची, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना धारेवर धरले. त्यावेळी पवार यांनी प्रश्नांचे सविस्तर उत्तरे देवून समाधान केले़ येत्या एक - दोन दिवसांत पाण्याची व्यवस्था करू, असे आश्वासनही त्यांनी दिले़ त्यामुळे ग्रामस्थांनी मोर्चा मागे घेतला.दरम्यान, गटविकास अधिकारी पवार यांनी सरपंच विजय गिरी यांना ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड गायब होणे, मोटर चोरीला जाणे, जे कोणी पाईप फोडत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? यासंदर्भात प्रश्न विचारले़ मी माझ्या पद्धतीने कारवाई करीत आहे, तुम्ही काय करत आहे, असे म्हणत गटविकास अधिकाºयांनी सरपंचांना धारेवर धरले. गावातील राजकारणामुळे सर्वसामान्य, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम राजकारणी लोकांनी करू नये हे योग्य नाही. राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचेही गटविकास अधिकारी यांनी सरपंचाला सांगितले़मोर्चात सरपंच विजय गिरी, शंकर बोंबले, दत्ताहारी शेळपुरी, हणमंत पाटील, किशन तुरे, प्रतिमा वाघमारे, गंगुबाई आंबेकर, लक्ष्मीबाई तुरे, अशोक तुरे, हानमंत तुरे, शंकर येताळे, कोंडिबा तुरे, राजू तुरे, जळबा तुरे,विलास तुरे, विठ्ठल तुरे, शेषराव रोन्टे, लक्ष्मण रोन्टे, सुनीता तुरे, संगीता तुरे,मरूबाई रोडेवार, श्याम तुरे, देऊबाई रोडेकर, सुनीता रोन्टे, गंगाधर तुरे, अशोक तुरे, पौर्णिमा तुरे, तुळसाबाई तुरे, सावित्रीबाई आंबेकर, दिलीप तुरे, तुळसाबाई रोन्टे भारतबाई तुरे, गंगूबाई आंबेकर, महादाबाई रोन्टे, पद्मीनबाई आंबेकर, अनुसयाबाई आंबेकर, सुनीता रोन्टे, देऊबाई रोडेकर, दीक्षा तुरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.