शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पाटोदा ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? ...

ठळक मुद्दे पंचायत समितीवर घागरमोर्चा दोन महिन्यांपासून पाणीटंचाई; गटविकास अधिका-यांना विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? सरपंच, ग्रामसेवक लक्ष देत नाहीत, नळपट्टी ,घरपट्टी देतो़ मग गावात पाणी का मिळत नाही? आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, मूलभूत सुविधा गावात मिळत नसतील तर ग्रामपंचायत कोणत्या कामाची, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना धारेवर धरले. त्यावेळी पवार यांनी प्रश्नांचे सविस्तर उत्तरे देवून समाधान केले़ येत्या एक - दोन दिवसांत पाण्याची व्यवस्था करू, असे आश्वासनही त्यांनी दिले़ त्यामुळे ग्रामस्थांनी मोर्चा मागे घेतला.दरम्यान, गटविकास अधिकारी पवार यांनी सरपंच विजय गिरी यांना ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड गायब होणे, मोटर चोरीला जाणे, जे कोणी पाईप फोडत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? यासंदर्भात प्रश्न विचारले़ मी माझ्या पद्धतीने कारवाई करीत आहे, तुम्ही काय करत आहे, असे म्हणत गटविकास अधिकाºयांनी सरपंचांना धारेवर धरले. गावातील राजकारणामुळे सर्वसामान्य, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम राजकारणी लोकांनी करू नये हे योग्य नाही. राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचेही गटविकास अधिकारी यांनी सरपंचाला सांगितले़मोर्चात सरपंच विजय गिरी, शंकर बोंबले, दत्ताहारी शेळपुरी, हणमंत पाटील, किशन तुरे, प्रतिमा वाघमारे, गंगुबाई आंबेकर, लक्ष्मीबाई तुरे, अशोक तुरे, हानमंत तुरे, शंकर येताळे, कोंडिबा तुरे, राजू तुरे, जळबा तुरे,विलास तुरे, विठ्ठल तुरे, शेषराव रोन्टे, लक्ष्मण रोन्टे, सुनीता तुरे, संगीता तुरे,मरूबाई रोडेवार, श्याम तुरे, देऊबाई रोडेकर, सुनीता रोन्टे, गंगाधर तुरे, अशोक तुरे, पौर्णिमा तुरे, तुळसाबाई तुरे, सावित्रीबाई आंबेकर, दिलीप तुरे, तुळसाबाई रोन्टे भारतबाई तुरे, गंगूबाई आंबेकर, महादाबाई रोन्टे, पद्मीनबाई आंबेकर, अनुसयाबाई आंबेकर, सुनीता रोन्टे, देऊबाई रोडेकर, दीक्षा तुरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.