शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

९९ हजार निराधारांना आधार, प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत निराधार, विधवा, दुर्धर रुग्ण, दिव्यांग, परित्यक्त्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती ...

केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत निराधार, विधवा, दुर्धर रुग्ण, दिव्यांग, परित्यक्त्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना १ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचा लाभ निराधारांना दिला जातो. २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना राज्य शासनाच्या व बीपीएल यादीत समाविष्ट असलेल्या निराधारांनाच केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ दिला होतो. परंतु या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अत्यल्प मिळणाऱ्या अनुदानावर उपजीविका कशी चालवावी, याबाबतची चिंता निराधार, वृद्ध व गरीब व्यक्तींना नेहमीच सतावत असते. आता तर मागील वर्षभरापासून कोरोना महामारीचा सामना करतानाच त्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मार्च २०२१ मध्ये नांदेड शहरातील लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संचारबंदी लावण्यात आली. याकाळात लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना एक हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

प्रतिक्रिया-

१. कोरोनामुळे मागील वर्षीपासून अनुदान वेळेवर मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्यात अनुदान मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात समाधान वाटले. मात्र, पुन्हा संचारबंदी असल्याने जगण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. - शंकर गिरी, नांदेड

२. शासनाने कोरोना काळात निराधार लाभार्थ्यांना कमीतकमी २ हजार रुपये तरी मदत करावी. कारण वाढत्या महागाईमुळे हे अनुदान तटपुंजे पडत आहे. दवाखान्याचा खर्च वाढल्यामुळे त्यात अधिकच भर पडली आहे.

- रामराव कांबळे, नांदेड

३. शासनाने दर महिन्याला वेळेवर अनुदान वाटप करावे, एवढीच आमची मागणी आहे. कारण अनुदान मिळण्याची वाट पहावी लागते. त्यामुळे मिळालेले अनुदान उधारी देण्यामध्येच जाते. तेव्हा दर महिन्याला जर अनुदान दिले तर त्याचा उपयोग होईल.

- जगन्नाथ वाघमारे, सांगवी.

४. कोरोनाची भीती वाटत आहे. त्यातच आम्ही निराधार असल्याने आम्हांला कोणी मदत करीत नाही. लोकांचा कामधंदा बंद असल्याने तेच अडचणीत आहेत. त्यामुळे आम्ही काेणाकडे मदत मागावी हा प्रश्न आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे.

- काशीबाई लोखंडे, नांदेड