शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

९९ हजार निराधारांना आधार, प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत निराधार, विधवा, दुर्धर रुग्ण, दिव्यांग, परित्यक्त्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती ...

केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत निराधार, विधवा, दुर्धर रुग्ण, दिव्यांग, परित्यक्त्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना १ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचा लाभ निराधारांना दिला जातो. २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना राज्य शासनाच्या व बीपीएल यादीत समाविष्ट असलेल्या निराधारांनाच केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ दिला होतो. परंतु या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अत्यल्प मिळणाऱ्या अनुदानावर उपजीविका कशी चालवावी, याबाबतची चिंता निराधार, वृद्ध व गरीब व्यक्तींना नेहमीच सतावत असते. आता तर मागील वर्षभरापासून कोरोना महामारीचा सामना करतानाच त्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मार्च २०२१ मध्ये नांदेड शहरातील लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संचारबंदी लावण्यात आली. याकाळात लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना एक हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

प्रतिक्रिया-

१. कोरोनामुळे मागील वर्षीपासून अनुदान वेळेवर मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्यात अनुदान मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात समाधान वाटले. मात्र, पुन्हा संचारबंदी असल्याने जगण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. - शंकर गिरी, नांदेड

२. शासनाने कोरोना काळात निराधार लाभार्थ्यांना कमीतकमी २ हजार रुपये तरी मदत करावी. कारण वाढत्या महागाईमुळे हे अनुदान तटपुंजे पडत आहे. दवाखान्याचा खर्च वाढल्यामुळे त्यात अधिकच भर पडली आहे.

- रामराव कांबळे, नांदेड

३. शासनाने दर महिन्याला वेळेवर अनुदान वाटप करावे, एवढीच आमची मागणी आहे. कारण अनुदान मिळण्याची वाट पहावी लागते. त्यामुळे मिळालेले अनुदान उधारी देण्यामध्येच जाते. तेव्हा दर महिन्याला जर अनुदान दिले तर त्याचा उपयोग होईल.

- जगन्नाथ वाघमारे, सांगवी.

४. कोरोनाची भीती वाटत आहे. त्यातच आम्ही निराधार असल्याने आम्हांला कोणी मदत करीत नाही. लोकांचा कामधंदा बंद असल्याने तेच अडचणीत आहेत. त्यामुळे आम्ही काेणाकडे मदत मागावी हा प्रश्न आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे.

- काशीबाई लोखंडे, नांदेड