शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

९९ हजार निराधारांना आधार, प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत निराधार, विधवा, दुर्धर रुग्ण, दिव्यांग, परित्यक्त्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती ...

केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत निराधार, विधवा, दुर्धर रुग्ण, दिव्यांग, परित्यक्त्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना १ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचा लाभ निराधारांना दिला जातो. २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना राज्य शासनाच्या व बीपीएल यादीत समाविष्ट असलेल्या निराधारांनाच केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ दिला होतो. परंतु या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अत्यल्प मिळणाऱ्या अनुदानावर उपजीविका कशी चालवावी, याबाबतची चिंता निराधार, वृद्ध व गरीब व्यक्तींना नेहमीच सतावत असते. आता तर मागील वर्षभरापासून कोरोना महामारीचा सामना करतानाच त्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मार्च २०२१ मध्ये नांदेड शहरातील लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संचारबंदी लावण्यात आली. याकाळात लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना एक हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

प्रतिक्रिया-

१. कोरोनामुळे मागील वर्षीपासून अनुदान वेळेवर मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्यात अनुदान मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात समाधान वाटले. मात्र, पुन्हा संचारबंदी असल्याने जगण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. - शंकर गिरी, नांदेड

२. शासनाने कोरोना काळात निराधार लाभार्थ्यांना कमीतकमी २ हजार रुपये तरी मदत करावी. कारण वाढत्या महागाईमुळे हे अनुदान तटपुंजे पडत आहे. दवाखान्याचा खर्च वाढल्यामुळे त्यात अधिकच भर पडली आहे.

- रामराव कांबळे, नांदेड

३. शासनाने दर महिन्याला वेळेवर अनुदान वाटप करावे, एवढीच आमची मागणी आहे. कारण अनुदान मिळण्याची वाट पहावी लागते. त्यामुळे मिळालेले अनुदान उधारी देण्यामध्येच जाते. तेव्हा दर महिन्याला जर अनुदान दिले तर त्याचा उपयोग होईल.

- जगन्नाथ वाघमारे, सांगवी.

४. कोरोनाची भीती वाटत आहे. त्यातच आम्ही निराधार असल्याने आम्हांला कोणी मदत करीत नाही. लोकांचा कामधंदा बंद असल्याने तेच अडचणीत आहेत. त्यामुळे आम्ही काेणाकडे मदत मागावी हा प्रश्न आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे.

- काशीबाई लोखंडे, नांदेड