शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सुनील पाईकराव यांची हत्या की आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:36 IST

कार्ला येथील सुनील पाईकराव ह्या २७ वर्षीय युवकाने घरकुलाच्या वादातून झालेल्या भांडणाचा ताण घेऊन २८ फेब्रुवारीला आत्महत्या केली़ तक्रार देऊनही मनाठा पोलिसांनी गुन्हाच नोंदविला नाही़ घटनेचा योग्य तपास केला असता तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला़ सुनील पाईकराव यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली?, याचीही चर्चा परिसरात दबक्या आवाजात रंगली आहे़

ठळक मुद्देमनाठा पोलिसांची भूमिका संशयास्पद: मात्र पोलीस म्हणतात, आत्महत्याच

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव: कार्ला येथील सुनील पाईकराव ह्या २७ वर्षीय युवकाने घरकुलाच्या वादातून झालेल्या भांडणाचा ताण घेऊन २८ फेब्रुवारीला आत्महत्या केली़ तक्रार देऊनही मनाठा पोलिसांनी गुन्हाच नोंदविला नाही़ घटनेचा योग्य तपास केला असता तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला़ सुनील पाईकराव यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली?, याचीही चर्चा परिसरात दबक्या आवाजात रंगली आहे़२७ नोव्हेंबर २०१७ रोजी घरकुल बांधकामावरून दोन चुलत भावात वाद होवून त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात दोघांनाही मार लागला. यातील एकावर औरंगाबादला तर दुसºयावर नांदेड येथे उपचार करण्यात आले. आरोपीला अटक नाही़ एमसीआर नाही़ त्यामुळे फिर्यादी पोलिसांना जाब विचारू लागला़ मात्र, आरोपीचे राजकीय धागेदोरे असल्याने पोलिसांनी मयताच्या नातेवाईकाला दाद दिली नाही़ तर गावातील प्रतिष्ठित मंडळींनी ‘घरचा मामला’ म्हणून याकडे दुर्लक्ष केले. यामुळे मयत सुनील पाईकराव तणावाखाली होते, काय झाले? तक्रार करून आमचे काय केले? तुला खतमच करतो, तुझ्या अंगावर गाडीच घालतो, अशा धमक्याही त्याला देण्यात आल्या. याची तक्रार पाईकराव यांनी पोलिसांत दिली, मात्र पुरावा काय? अशी विचारणा करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे टाळले, अर्ज चौकशीसाठी ठेवून आरोपींशी ‘अर्थपूर्ण बोलणी’ सुरु केली, अन्यथा गुन्हा नोंदवितो, असा दमही भरला.आत्महत्येचा प्रकार पाहिला तर घातपात वाटतो़ फाशी झाडाला, घरात, शेतात सहसा घेतली जाते़ परंतु सुनील पाईकराव यांनी कोरड्या विहिरीची निवड का केली? त्यांचा मृतदेह कोरड्या विहिरीत लटकलेला मिळाला़ त्यांच्या टोंगळ्याला, कमरेला जबर मार असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. मयताचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्याचा वाद चव्हाट्यावर आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे़ सदर कुटुंब गावातच राहत नाही, ती शक्यता धूसर होते़ आत्महत्या करण्यासाठी कारण लागते़ तणावाखाली आल्याशिवाय किंवा मनासारखे न झाल्याने व्यक्ती आत्महत्या करतो, असे मानसशास्त्र सांगते.सुनील पाईकराव यांच्या घराचे बांधकाम रखडले आहे़ दवाखाना, पोलिसांचा ससेमिरा यासाठी प्रचंड खर्च दोन्ही पार्टीला झाला.मयताने हातावर मी फिर्यादी आहे मला न्याय मिळाला नाही, असे लिहून ठेवले होते़ त्यामुळे तपासिक अधिकाºयांवरही शंका निर्माण होते़अर्ज चौकशीवर ठेवून पोलिसांची ‘अर्थपूर्ण’ बोलणीसुनील पाईकराव तणावाखाली होते,काय झाले तक्रार करून आमचे काय केले़? तुला खतमच करतो, तुझ्या अंगावर गाडीच घालतो, अशा धमक्याही त्याला देण्यात आल्या, मात्र पुरावा काय? अशी विचारणा करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे टाळले, अर्ज चौकशीसाठी ठेवून आरोपींशी ‘बोलणी’ सुरु केली, अन्यथा गुन्हा नोंदवितो, असा दमही भरला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.म्हणे दोघांवरही गुन्हे दाखल केलेत...!पोलिसांनी प्रथम फिर्यादीची बाजू घ्यायला पाहिजे़ त्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा फिर्यादीची असते़ मात्र राजकीय दबावाखाली फिर्याद न घेणे, गुन्ह्याचे स्वरुप कमी होणे, आदी प्रकार मनाठा ठाण्यात नित्याचेच झाले. पोलिसांनी याप्रकरणी खंबीर भूमिका घेतली असती तर सुनील पाईकराव जिवंत राहिले असते, मात्र, आम्ही दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत़ ही आत्महत्या आहे, त्यामुळे ३०६, ३०७ चा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही़ तपास सुरू आहे़, अशी बाजू पोलीस मांडत आहेत.