शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

सुनील पाईकराव यांची हत्या की आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:36 IST

कार्ला येथील सुनील पाईकराव ह्या २७ वर्षीय युवकाने घरकुलाच्या वादातून झालेल्या भांडणाचा ताण घेऊन २८ फेब्रुवारीला आत्महत्या केली़ तक्रार देऊनही मनाठा पोलिसांनी गुन्हाच नोंदविला नाही़ घटनेचा योग्य तपास केला असता तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला़ सुनील पाईकराव यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली?, याचीही चर्चा परिसरात दबक्या आवाजात रंगली आहे़

ठळक मुद्देमनाठा पोलिसांची भूमिका संशयास्पद: मात्र पोलीस म्हणतात, आत्महत्याच

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव: कार्ला येथील सुनील पाईकराव ह्या २७ वर्षीय युवकाने घरकुलाच्या वादातून झालेल्या भांडणाचा ताण घेऊन २८ फेब्रुवारीला आत्महत्या केली़ तक्रार देऊनही मनाठा पोलिसांनी गुन्हाच नोंदविला नाही़ घटनेचा योग्य तपास केला असता तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला़ सुनील पाईकराव यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली?, याचीही चर्चा परिसरात दबक्या आवाजात रंगली आहे़२७ नोव्हेंबर २०१७ रोजी घरकुल बांधकामावरून दोन चुलत भावात वाद होवून त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात दोघांनाही मार लागला. यातील एकावर औरंगाबादला तर दुसºयावर नांदेड येथे उपचार करण्यात आले. आरोपीला अटक नाही़ एमसीआर नाही़ त्यामुळे फिर्यादी पोलिसांना जाब विचारू लागला़ मात्र, आरोपीचे राजकीय धागेदोरे असल्याने पोलिसांनी मयताच्या नातेवाईकाला दाद दिली नाही़ तर गावातील प्रतिष्ठित मंडळींनी ‘घरचा मामला’ म्हणून याकडे दुर्लक्ष केले. यामुळे मयत सुनील पाईकराव तणावाखाली होते, काय झाले? तक्रार करून आमचे काय केले? तुला खतमच करतो, तुझ्या अंगावर गाडीच घालतो, अशा धमक्याही त्याला देण्यात आल्या. याची तक्रार पाईकराव यांनी पोलिसांत दिली, मात्र पुरावा काय? अशी विचारणा करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे टाळले, अर्ज चौकशीसाठी ठेवून आरोपींशी ‘अर्थपूर्ण बोलणी’ सुरु केली, अन्यथा गुन्हा नोंदवितो, असा दमही भरला.आत्महत्येचा प्रकार पाहिला तर घातपात वाटतो़ फाशी झाडाला, घरात, शेतात सहसा घेतली जाते़ परंतु सुनील पाईकराव यांनी कोरड्या विहिरीची निवड का केली? त्यांचा मृतदेह कोरड्या विहिरीत लटकलेला मिळाला़ त्यांच्या टोंगळ्याला, कमरेला जबर मार असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. मयताचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्याचा वाद चव्हाट्यावर आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे़ सदर कुटुंब गावातच राहत नाही, ती शक्यता धूसर होते़ आत्महत्या करण्यासाठी कारण लागते़ तणावाखाली आल्याशिवाय किंवा मनासारखे न झाल्याने व्यक्ती आत्महत्या करतो, असे मानसशास्त्र सांगते.सुनील पाईकराव यांच्या घराचे बांधकाम रखडले आहे़ दवाखाना, पोलिसांचा ससेमिरा यासाठी प्रचंड खर्च दोन्ही पार्टीला झाला.मयताने हातावर मी फिर्यादी आहे मला न्याय मिळाला नाही, असे लिहून ठेवले होते़ त्यामुळे तपासिक अधिकाºयांवरही शंका निर्माण होते़अर्ज चौकशीवर ठेवून पोलिसांची ‘अर्थपूर्ण’ बोलणीसुनील पाईकराव तणावाखाली होते,काय झाले तक्रार करून आमचे काय केले़? तुला खतमच करतो, तुझ्या अंगावर गाडीच घालतो, अशा धमक्याही त्याला देण्यात आल्या, मात्र पुरावा काय? अशी विचारणा करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे टाळले, अर्ज चौकशीसाठी ठेवून आरोपींशी ‘बोलणी’ सुरु केली, अन्यथा गुन्हा नोंदवितो, असा दमही भरला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.म्हणे दोघांवरही गुन्हे दाखल केलेत...!पोलिसांनी प्रथम फिर्यादीची बाजू घ्यायला पाहिजे़ त्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा फिर्यादीची असते़ मात्र राजकीय दबावाखाली फिर्याद न घेणे, गुन्ह्याचे स्वरुप कमी होणे, आदी प्रकार मनाठा ठाण्यात नित्याचेच झाले. पोलिसांनी याप्रकरणी खंबीर भूमिका घेतली असती तर सुनील पाईकराव जिवंत राहिले असते, मात्र, आम्ही दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत़ ही आत्महत्या आहे, त्यामुळे ३०६, ३०७ चा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही़ तपास सुरू आहे़, अशी बाजू पोलीस मांडत आहेत.