शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

परभणीतील विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती तर हिंगोलीतील विद्यार्थी अद्यापही घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते ...

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हा वगळला तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसू लागली आहे. ४ जानेवारी रोजीच्या शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मराठवाड्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी परभणी जिल्ह्यात उपस्थित होते. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १२.८ टक्के विद्यार्थीच शाळेमध्ये आले होते.राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु केल्या आहेत. राज्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या एकूण २२ हजार २०४ शाळा असून यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५६ लाख ४८ हजार २८ इतकी आहे. २३ नोव्हेंबर रोजी यातील ९ हजार १२७ शाळा सुरु होऊन २९ लाख ९१हजार ८३ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर हळूहळू इतर शाळाही सुरु होवू लागल्या. ४ जानेवारीपर्यंत ९ वी ते १२ वी या वर्गाच्या राज्यातील १९ हजार ५२४ शाळा सुरु झाल्या असून १५ लाख ७० हजार ८०७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले आहेत.

मराठवाड्यातील शाळांचा विचार करता मराठवाड्यातील इयत्ता ९ वी ते १२वीच्या ४ हजार ७८६ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ४६५, लातूर जिल्ह्यातील ४९१, जालना जिल्ह्यातील ५१९, औरंगाबाद जिल्हयातील ११२०, बीड जिल्ह्यातील ७६०, नांदेड जिल्ह्यातील ८५४, परभणी जिल्ह्यातील ५३७ तर हिंगोली जिल्ह्यातील १४६ शाळांचा यामध्ये समावेश असून मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात हेच प्रमाण ३५.४ टक्के, लातूर ५२ टक्के, जालना ५३.१ टक्के, बीड १८ टक्के, नांदेड ३०.३ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४ जानेवारी रोजी १२.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते.

चौकट........

सर्वाधिक शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु

इयत्ता ९ वी ते १२वीच्या शाळांना सध्या प्रारंभ झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ९९.५ टक्के शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. या शाळामध्ये ४ जानेवारी रोजी ५७ हजार ४१२ विद्यार्थी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयात ९४.७ टक्के, लातूर ८७.१ टक्के, जालना ९८.७ टक्के, औरंगाबाद ९६.७ टक्के, बीड ९९ टक्के, परभणी ८९.८ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४८ टक्के शाळा ४ जानेवारीपर्यंत सुरु झालेल्या आहेत.