शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

परभणीतील विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती तर हिंगोलीतील विद्यार्थी अद्यापही घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते ...

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हा वगळला तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसू लागली आहे. ४ जानेवारी रोजीच्या शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मराठवाड्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी परभणी जिल्ह्यात उपस्थित होते. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १२.८ टक्के विद्यार्थीच शाळेमध्ये आले होते.राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु केल्या आहेत. राज्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या एकूण २२ हजार २०४ शाळा असून यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५६ लाख ४८ हजार २८ इतकी आहे. २३ नोव्हेंबर रोजी यातील ९ हजार १२७ शाळा सुरु होऊन २९ लाख ९१हजार ८३ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर हळूहळू इतर शाळाही सुरु होवू लागल्या. ४ जानेवारीपर्यंत ९ वी ते १२ वी या वर्गाच्या राज्यातील १९ हजार ५२४ शाळा सुरु झाल्या असून १५ लाख ७० हजार ८०७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले आहेत.

मराठवाड्यातील शाळांचा विचार करता मराठवाड्यातील इयत्ता ९ वी ते १२वीच्या ४ हजार ७८६ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ४६५, लातूर जिल्ह्यातील ४९१, जालना जिल्ह्यातील ५१९, औरंगाबाद जिल्हयातील ११२०, बीड जिल्ह्यातील ७६०, नांदेड जिल्ह्यातील ८५४, परभणी जिल्ह्यातील ५३७ तर हिंगोली जिल्ह्यातील १४६ शाळांचा यामध्ये समावेश असून मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात हेच प्रमाण ३५.४ टक्के, लातूर ५२ टक्के, जालना ५३.१ टक्के, बीड १८ टक्के, नांदेड ३०.३ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४ जानेवारी रोजी १२.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते.

चौकट........

सर्वाधिक शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु

इयत्ता ९ वी ते १२वीच्या शाळांना सध्या प्रारंभ झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ९९.५ टक्के शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. या शाळामध्ये ४ जानेवारी रोजी ५७ हजार ४१२ विद्यार्थी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयात ९४.७ टक्के, लातूर ८७.१ टक्के, जालना ९८.७ टक्के, औरंगाबाद ९६.७ टक्के, बीड ९९ टक्के, परभणी ८९.८ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४८ टक्के शाळा ४ जानेवारीपर्यंत सुरु झालेल्या आहेत.