शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती तर हिंगोलीतील विद्यार्थी अद्यापही घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते ...

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हा वगळला तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसू लागली आहे. ४ जानेवारी रोजीच्या शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मराठवाड्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी परभणी जिल्ह्यात उपस्थित होते. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १२.८ टक्के विद्यार्थीच शाळेमध्ये आले होते.राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु केल्या आहेत. राज्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या एकूण २२ हजार २०४ शाळा असून यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५६ लाख ४८ हजार २८ इतकी आहे. २३ नोव्हेंबर रोजी यातील ९ हजार १२७ शाळा सुरु होऊन २९ लाख ९१हजार ८३ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर हळूहळू इतर शाळाही सुरु होवू लागल्या. ४ जानेवारीपर्यंत ९ वी ते १२ वी या वर्गाच्या राज्यातील १९ हजार ५२४ शाळा सुरु झाल्या असून १५ लाख ७० हजार ८०७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले आहेत.

मराठवाड्यातील शाळांचा विचार करता मराठवाड्यातील इयत्ता ९ वी ते १२वीच्या ४ हजार ७८६ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ४६५, लातूर जिल्ह्यातील ४९१, जालना जिल्ह्यातील ५१९, औरंगाबाद जिल्हयातील ११२०, बीड जिल्ह्यातील ७६०, नांदेड जिल्ह्यातील ८५४, परभणी जिल्ह्यातील ५३७ तर हिंगोली जिल्ह्यातील १४६ शाळांचा यामध्ये समावेश असून मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात हेच प्रमाण ३५.४ टक्के, लातूर ५२ टक्के, जालना ५३.१ टक्के, बीड १८ टक्के, नांदेड ३०.३ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४ जानेवारी रोजी १२.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते.

चौकट........

सर्वाधिक शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु

इयत्ता ९ वी ते १२वीच्या शाळांना सध्या प्रारंभ झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ९९.५ टक्के शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. या शाळामध्ये ४ जानेवारी रोजी ५७ हजार ४१२ विद्यार्थी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयात ९४.७ टक्के, लातूर ८७.१ टक्के, जालना ९८.७ टक्के, औरंगाबाद ९६.७ टक्के, बीड ९९ टक्के, परभणी ८९.८ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४८ टक्के शाळा ४ जानेवारीपर्यंत सुरु झालेल्या आहेत.