शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

केदारगुडा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:38 IST

केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.

हदगाव : केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.केदारगुडा येथे आदिवासी मुली-मुलांची शासकीय आश्रमशाळा आहे. मुलीसाठी अधीक्षिका असूनही मुलीचे मासिक पाळीचे रिपोर्ट त्यांनी निरंक दाखविले. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यातही शाळेत उपस्थित असल्याचे हजेरीपटावरुन सिद्ध झाले. तो पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. दर महिन्याला मुलीची तपासणी करण्याचा अधिकार अधीक्षिकांना आहे. मुलासाठी स्वतंत्र पुरुष अधीक्षक असतो. मुलीचे जेवण त्यांना स्वतंत्र पुरविण्याची जबाबदारी अधीक्षिकांची असते. त्यांनी दिलेल्या अहवालावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असते. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यात शाळेत उपस्थित होती. त्या महिन्याच्या तपासणीत तिचा अहवाल निरंक दिला. हा गंभीर प्रकार आहे. याउलट हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक ए. जे. झुंजारे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पालकांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला व लग्नाचा उपायही सुचविला, असा आरोप आहे. आश्रमशाळेत मुलगी असताना शाळाबाह्य मुले शाळेत येतातच कसे, या प्रश्नाचे उत्तर मुख्याध्यापक देऊ शकत नाहीत. मुलगी शाळेत नियमित येत नसे व मासिक पाळीची तपासणी सहा महिन्याला एकदा होत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगून अधीक्षिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी पीओ आले नव्हते तर इतर चौकशीसाठी आल्याचे ते म्हणाले. पण इतर कोणत्या प्रकरणात तपास सुरु आहे, याचे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले नाही. असा गंभीर प्रकार घडल्यानंतर मुलाला गंभीर शिक्षा असल्यामुुळे ते तत्काळ लग्न करुन स्वत:चा बचाव करुन घेतात. पुन्हा त्या मुलीला वाऱ्यावर सोडून देतात. असे प्रकार यापूर्वी याच शाळेत घडले आहेत. मुख्याध्यापक व स्त्री अधीक्षक या प्रकरणात दोषी असून त्यांच्यावर प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.४मुलीचे लग्न १८ आणि २१ वर्षे झाल्याशिवाय मुलाचा विवाह करता येत नाही. तसा कायदाही आहे. याचाही विसर मुख्याध्यापकांना पडल्याचा दिसतो. या गंभीर प्रकरणामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतात, याचाही विसर पडल्याचे दिसते. झालेला प्रकार गंभीर असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तामसा येथील आदिवासी बचाव संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी