शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जप्त वाळूसाठी ठेकेदारांची जोरदार फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:21 IST

बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अवैधरित्या जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव १५ रोजी होणार असून यासाठी अनेक ठेकेदारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. वाळू लिलावात बोली लावण्याच्या पूर्वतयारीसाठी जमलेल्या ठेकेदारांमध्ये तहसील कार्यालयात यावरून चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी अधिकाऱ्यांनी या सर्व ठेकेदारांना बाहेर बसवून शांत केले. नांदेड जिल्ह्यात ...

ठळक मुद्देउमरीत पाच हजारपेक्षाही अधिक ब्रास वाळूसाठा : शासकीय दर १२७६ वरुन २२०० रुपये प्रतिब्रास

बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अवैधरित्या जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव १५ रोजी होणार असून यासाठी अनेक ठेकेदारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. वाळू लिलावात बोली लावण्याच्या पूर्वतयारीसाठी जमलेल्या ठेकेदारांमध्ये तहसील कार्यालयात यावरून चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी अधिकाऱ्यांनी या सर्व ठेकेदारांना बाहेर बसवून शांत केले. नांदेड जिल्ह्यात केवळ उमरी तालुक्यात सहा वाळूघाट असून शासनाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात गोदावरी नदीतून वाळूचा उपसा करण्यात आला. गोदावरी नदीच्या परिसरात महाटी, येंडाळा, कौडगाव, शिंगणापूर, बिजेगाव, कावलगुडा, हस्सा आदी गावांच्या शिवारात या वाळूचे साठे करण्यात आले. उमरी तहसीलतर्फे या अवैधरित्या जमा केलेल्या वाळू साठ्यांची जप्ती करण्यात आली. सध्या उमरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या परिसरात सुमारे पाच हजार ब्रासपेक्षाही अधिक अवैधरित्या वाळूचे साठे आहेत. असे असले तरी सदरील वाळू साठा कमी प्रमाणात असल्याचे भासवून कमी पैशामध्ये या वाळूची बोली लावण्याचा घाट अनेकांनी रचला आहे. असे असले तरी प्रशासन याबाबत काय भूमिका घेते यावर बरेच अवलंबून आहे. यापूर्वीचा वाळूचा शासकीय दर १२७६ रुपये प्रतिब्रास याप्रमाणे होता. आता त्यात वाढ होऊन प्रतिब्रास २२०० रुपये एवढा झालेला आहे. येत्या आर्थिक वर्षात वाळू घाटांच्या लिलावा संदर्भात प्रक्रिया सुरू होत आहे. उमरी तालुक्यातील सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण झाले असून भूवैज्ञानिक खात्याच्यावतीने सर्वेक्षण झाले आहे. त्यांच्या अहवालानुसार आगामी लिलावासाठीचे वाळूघाट निश्चित केले जातील. त्यानुसार सर्व नियम व अटी यांचे पालन करून वाळू घाटांचा लिलाव होईल.अवैध वाळूचे चार टिप्पर पकडलेउमरी : येथील महसूल विभागातर्फे आज पहाटे वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली असून बळेगाव येथे गोदावरी नदीपात्रातून गाढवांद्वारे जमा केलेली वाळू अवैधरित्या वाहतूक करताना चार टिप्पर पकडण्यात आले. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेश लांडगे, जी. एस. कोतलगावकर, मंडळ अधिकारी एस.बी.जाधव, एस.बी. बाचीपल्ले, तलाठी सोन्नर, हराळ, जाधव तसेच कोतवाल दिलीप यमेवार, राठोड आदींनी ही कारवाई केली. बळेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार १० आॅक्टोबर रोजी बुधवारी पहाटे पाच वाजेपासून बळेगाव येथील गोदावरी नदीपात्राशेजारी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पाळत ठेवली होती. यावेळी अचानक धाडी टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार टिप्पर पकडण्यात आले. महसूल विभागाने पकडलेल्या टिपरचे क्रमांक एमएच-२६-बीई , एमएच-२६ एडी- ३०५५ , एमएच-२० वाय-८३४१, एमएच-१६-जी-६५७९ याप्रमाणे आहेत.सदर वाहनांना नियमानुसार दंड आकारण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळू