शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जाधवांच्या माघारीने पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:42 IST

लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात चर्चेला तोंड अनुभवशून्यतेमुळे सेनेत घेतले जाताहेत उफराटे निर्णय

हिंगोली : लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा सेनेलाच जास्त फटका बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे हे मागच्या वेळी सेनेकडून या मतदारसंघात लोकसभा लढले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील मंडळींनीच बंड पुकारले होते. वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दगाफटका झाला होता. वानखेडे यांचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा व माजी आ. गजानन घुगे यांच्याशी बिनसलेले असल्याने हा प्रकार घडला होता. लोकसभा संपली. वानखेडे पडले. मात्र या दोन्ही मतदारसंघातील वानखेडे समर्थक कमालीचे नाराज होते. विधानसभेला ते सेनेचे काम करायचे नाही, या तयारीत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत घुगे व मुंदडा यांना तिकीट जाहीर झाले अन् वानखेडे यांनी भाजपला जवळ केले. वानखेडे समर्थकांनीही मग वसमतमध्ये भाजपच्या तंबूत जागा मिळविली. त्यात थोडेबहुत राष्ट्रवादीवर नाराज असलेलेही घुसले. परिणामी, जाधव यांनी ५0 हजारांपर्यंत मते मिळविली होती. भाजप स्वतंत्र लढण्याची चिन्हे असल्याने या मंडळीनेच जाधव यांना लोकसभेसाठी तयार केले. कुठेच उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणूनही तयारी केली. सेनेमुळे तेथेही माघार घ्यावी लागली. आता ही मंडळी सेनेसोबत जायचे कसे? असा विचार करीत आहे. तर वानखेडेही काँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यामुळे ते वानखेडे यांच्याच पदरात माप टाकतील, ही मोठी शक्यता आहे. नांदेडच्या हेमंत पाटील यांच्याशी जुळण्यापेक्षा त्यांना पूर्वीचे नेतृत्व असलेल्या वानखेडे यांच्याशी जुळण्यासाठी जास्त वाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.वसमत वगळता इतरत्र मात्र जाधव यांच्यामुळे सेनेपेक्षा काँग्रेसलाच खूप जास्त सुरुंग लागण्याची चिन्हे होती. खरेतर काँग्रेसनेच जाधव यांची जास्त चिंता करणे अपेक्षित होते. मात्र सेनेने त्यांना माघार घेण्यासाठी मनधरणी केली. जाधव यांच्या नावाची झालेली चर्चा व त्यांनी चालविलेली तयारी पाहता त्यांनी बाहेरही चांगली मते मिळविली असती. त्यात काँग्रेसची मोठी गोची होण्याची भीती होती. शिवाय काँग्रेसचे काही नाराजही गळाला लागले असते. मात्र हा काँग्रेसला बसणारा फटकाही वाचला. त्यामुळे जाधव यांच्या माघारीमुळे एकप्रकारे सेनेने स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.बाहेरचा उमेदवार : माहिती नसल्याचा परिणामआ.हेमंत पाटील हे नांदेडचे आमदार असल्याने त्यांना हिंगोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीविषयी फारशी माहिती असणे अभिप्रेतच नाही. एकतर त्यांनी थेट उमेदवारीवर दावा करायलाच हजेरी लावली अन् उमेदवारी जाहीर झाल्यावरच पहिल्यांदा राजकीय दौरा केला. त्यामुळे जाधव यांच्यामुळे फायदा की तोटा? याचे गणित त्यांना कळाले नाही. आ. डॉ.मुंदडा यांच्या अनुभवी नजरेतून पाहिले असते तर हे कळाले असते. मात्र तेही बाहेर असल्याने इतर कुणी गांभीर्य दाखविले नाही.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण