शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

जाधवांच्या माघारीने पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:42 IST

लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात चर्चेला तोंड अनुभवशून्यतेमुळे सेनेत घेतले जाताहेत उफराटे निर्णय

हिंगोली : लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा सेनेलाच जास्त फटका बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे हे मागच्या वेळी सेनेकडून या मतदारसंघात लोकसभा लढले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील मंडळींनीच बंड पुकारले होते. वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दगाफटका झाला होता. वानखेडे यांचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा व माजी आ. गजानन घुगे यांच्याशी बिनसलेले असल्याने हा प्रकार घडला होता. लोकसभा संपली. वानखेडे पडले. मात्र या दोन्ही मतदारसंघातील वानखेडे समर्थक कमालीचे नाराज होते. विधानसभेला ते सेनेचे काम करायचे नाही, या तयारीत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत घुगे व मुंदडा यांना तिकीट जाहीर झाले अन् वानखेडे यांनी भाजपला जवळ केले. वानखेडे समर्थकांनीही मग वसमतमध्ये भाजपच्या तंबूत जागा मिळविली. त्यात थोडेबहुत राष्ट्रवादीवर नाराज असलेलेही घुसले. परिणामी, जाधव यांनी ५0 हजारांपर्यंत मते मिळविली होती. भाजप स्वतंत्र लढण्याची चिन्हे असल्याने या मंडळीनेच जाधव यांना लोकसभेसाठी तयार केले. कुठेच उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणूनही तयारी केली. सेनेमुळे तेथेही माघार घ्यावी लागली. आता ही मंडळी सेनेसोबत जायचे कसे? असा विचार करीत आहे. तर वानखेडेही काँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यामुळे ते वानखेडे यांच्याच पदरात माप टाकतील, ही मोठी शक्यता आहे. नांदेडच्या हेमंत पाटील यांच्याशी जुळण्यापेक्षा त्यांना पूर्वीचे नेतृत्व असलेल्या वानखेडे यांच्याशी जुळण्यासाठी जास्त वाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.वसमत वगळता इतरत्र मात्र जाधव यांच्यामुळे सेनेपेक्षा काँग्रेसलाच खूप जास्त सुरुंग लागण्याची चिन्हे होती. खरेतर काँग्रेसनेच जाधव यांची जास्त चिंता करणे अपेक्षित होते. मात्र सेनेने त्यांना माघार घेण्यासाठी मनधरणी केली. जाधव यांच्या नावाची झालेली चर्चा व त्यांनी चालविलेली तयारी पाहता त्यांनी बाहेरही चांगली मते मिळविली असती. त्यात काँग्रेसची मोठी गोची होण्याची भीती होती. शिवाय काँग्रेसचे काही नाराजही गळाला लागले असते. मात्र हा काँग्रेसला बसणारा फटकाही वाचला. त्यामुळे जाधव यांच्या माघारीमुळे एकप्रकारे सेनेने स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.बाहेरचा उमेदवार : माहिती नसल्याचा परिणामआ.हेमंत पाटील हे नांदेडचे आमदार असल्याने त्यांना हिंगोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीविषयी फारशी माहिती असणे अभिप्रेतच नाही. एकतर त्यांनी थेट उमेदवारीवर दावा करायलाच हजेरी लावली अन् उमेदवारी जाहीर झाल्यावरच पहिल्यांदा राजकीय दौरा केला. त्यामुळे जाधव यांच्यामुळे फायदा की तोटा? याचे गणित त्यांना कळाले नाही. आ. डॉ.मुंदडा यांच्या अनुभवी नजरेतून पाहिले असते तर हे कळाले असते. मात्र तेही बाहेर असल्याने इतर कुणी गांभीर्य दाखविले नाही.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण