शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

जाधवांच्या माघारीने पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:42 IST

लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात चर्चेला तोंड अनुभवशून्यतेमुळे सेनेत घेतले जाताहेत उफराटे निर्णय

हिंगोली : लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा सेनेलाच जास्त फटका बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे हे मागच्या वेळी सेनेकडून या मतदारसंघात लोकसभा लढले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील मंडळींनीच बंड पुकारले होते. वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दगाफटका झाला होता. वानखेडे यांचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा व माजी आ. गजानन घुगे यांच्याशी बिनसलेले असल्याने हा प्रकार घडला होता. लोकसभा संपली. वानखेडे पडले. मात्र या दोन्ही मतदारसंघातील वानखेडे समर्थक कमालीचे नाराज होते. विधानसभेला ते सेनेचे काम करायचे नाही, या तयारीत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत घुगे व मुंदडा यांना तिकीट जाहीर झाले अन् वानखेडे यांनी भाजपला जवळ केले. वानखेडे समर्थकांनीही मग वसमतमध्ये भाजपच्या तंबूत जागा मिळविली. त्यात थोडेबहुत राष्ट्रवादीवर नाराज असलेलेही घुसले. परिणामी, जाधव यांनी ५0 हजारांपर्यंत मते मिळविली होती. भाजप स्वतंत्र लढण्याची चिन्हे असल्याने या मंडळीनेच जाधव यांना लोकसभेसाठी तयार केले. कुठेच उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणूनही तयारी केली. सेनेमुळे तेथेही माघार घ्यावी लागली. आता ही मंडळी सेनेसोबत जायचे कसे? असा विचार करीत आहे. तर वानखेडेही काँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यामुळे ते वानखेडे यांच्याच पदरात माप टाकतील, ही मोठी शक्यता आहे. नांदेडच्या हेमंत पाटील यांच्याशी जुळण्यापेक्षा त्यांना पूर्वीचे नेतृत्व असलेल्या वानखेडे यांच्याशी जुळण्यासाठी जास्त वाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.वसमत वगळता इतरत्र मात्र जाधव यांच्यामुळे सेनेपेक्षा काँग्रेसलाच खूप जास्त सुरुंग लागण्याची चिन्हे होती. खरेतर काँग्रेसनेच जाधव यांची जास्त चिंता करणे अपेक्षित होते. मात्र सेनेने त्यांना माघार घेण्यासाठी मनधरणी केली. जाधव यांच्या नावाची झालेली चर्चा व त्यांनी चालविलेली तयारी पाहता त्यांनी बाहेरही चांगली मते मिळविली असती. त्यात काँग्रेसची मोठी गोची होण्याची भीती होती. शिवाय काँग्रेसचे काही नाराजही गळाला लागले असते. मात्र हा काँग्रेसला बसणारा फटकाही वाचला. त्यामुळे जाधव यांच्या माघारीमुळे एकप्रकारे सेनेने स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.बाहेरचा उमेदवार : माहिती नसल्याचा परिणामआ.हेमंत पाटील हे नांदेडचे आमदार असल्याने त्यांना हिंगोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीविषयी फारशी माहिती असणे अभिप्रेतच नाही. एकतर त्यांनी थेट उमेदवारीवर दावा करायलाच हजेरी लावली अन् उमेदवारी जाहीर झाल्यावरच पहिल्यांदा राजकीय दौरा केला. त्यामुळे जाधव यांच्यामुळे फायदा की तोटा? याचे गणित त्यांना कळाले नाही. आ. डॉ.मुंदडा यांच्या अनुभवी नजरेतून पाहिले असते तर हे कळाले असते. मात्र तेही बाहेर असल्याने इतर कुणी गांभीर्य दाखविले नाही.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण