शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

यावर्षीचा खरीप पेरणीचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड ...

यावर्षीचा खरीप पेरणीचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीत शेतकरी चोहोबाजूंनी पिचलेला असून, त्यात खतांची ही दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे. एका हाताने शेतकऱ्यांना मदत म्हणून ५०० रुपये द्यायचे आणि खत, डिझेल या शेतीउपयोगी वस्तूंच्या किमती वाढवून १००० रुपये त्याच्या खिशातून काढायचे असे दुट्टपी धोरण आता केंद्र सरकारने बंद करावे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांना देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना प्रदेश पदाधिकारी मंगलताई निमकर, डॉ. रेखा पाटील चव्हाण, मंगल धुळेकर, सुमती व्याहाळकर, अनिता हिंगोले, महिला जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डक, तसेच जेसीका शिंदे, शाहीन समदानी, पुनीता रावत, सुनंदा देशमुख, पद्मा झम्पलवाड, सीमा राठोड, जयश्री जैस्वाल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या