शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जलशुद्धीकरण केंद्रांच्या स्वच्छतेला झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:58 IST

शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो.

ठळक मुद्देमहापालिका : तीन वर्षानंतर केली जाते स्वच्छता

नांदेड : शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो.शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ५ जलशुद्धीकरण केंद्र आहेत. या शुद्धीकरण केंद्रात गोदावरी नदी तसेच सांगवी बंधाऱ्यातून पाणी घेतले जाते. या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन पाणी शहरातील विविध भागांत असलेल्या जलकुंभात पुरवठा केला जातो. त्यानंतर विविध भागात हे पाणी पिण्यासाठी पुरवले जाते. शहरात काबरानगर येथे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये एक ६० दशलक्ष लिटर आणि दुसरे शुद्धीकरण केंद्र हे ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे आहे. दक्षिण नांदेडला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असदवन येथेही ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. सिडको येथेच १२.०६ दशलक्ष लिटर क्षमतेचे केंद्र आहे. तसेच नवीन डंकीन पंपहाऊस येथेही २७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या केंद्रातून पाणी शुद्ध करुन शहराला पुरवले जाते.या जलशुद्धीकरण केंद्रामधील गाळ काढण्याचे काम महापालिकेने ७ फेब्रुवारीपासून हाती घेतले आहे. जवळपास फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. पूर आल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात येणारा गाळ मोठ्या प्रमाणात साचला जातो. हा गाळ काढून जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालावे यासाठी दर दोन ते तीन वर्षांनी हा गाळ काढला जातो, अशी माहिती उपअभियंता संघरत्न सोनसळे यांनी दिली. जवळपास १० लाख रुपये या कामासाठी खर्च केले जाणार आहेत.शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या स्वच्छता कामामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या स्वच्छतेदरम्यान पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठा विभागाने केली आहे.दरम्यान, आयुक्त लहुराज माळी यांनी शहरातील पंपगृहाच्या पाहणीदरम्यान पाणीपुरवठा विभागाला अनेक सूचना केल्या आहेत. असदवनकडे जाणा-या जलवाहिनीची गळती सुरू आहे. ती तत्काळ रोखावी, अशी सूचना त्यांनी केली.शहरालगतच्या हातपंपांचीही दुरुस्ती करण्याचे निर्देशशहरात असलेल्या हातपंप आणि पॉवरपंप दुरुस्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. ७१० हातपंपांपैकी दक्षिण नांदेडातील १९८ आणि उत्तर नांदेडातील ७२ हातपंपांच्या दुरुस्तीचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाWaterपाणी