शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वळण रस्त्यावर बस पलटली, १४ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

By श्रीनिवास भोसले | Updated: August 8, 2023 20:52 IST

अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

बिलोली : उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी मारल्याने १४ प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली आहे.

बिलोली अगाराची बस क्रं. MH 20 BL1903 ही उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी.अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले असून, उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पो.नि. विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये अनुक्रमे केराबाई ढगे (चिरली ४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव ३२), मोहन मोरकर (चिरली ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव ११), रमा कैवारे (चिरली ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली ५०), सविता राठोड (जारीकोट २७), हाजरा पठाण (पिंपळगाव ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट ६०), अनुसया स्वामी (जारीकोट ६०), पार्वती स्वामी ५५) यांचा समावेश आहे.

बिलोली, कुंडलवाडी, उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्ता आणि वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलविले आहे, अशी माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली.

बिलोली अगाराची बस क्रं. एमएच २० बीएल १९०३ ही उमरीहून रावधानोरा मार्गे बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ हा अपघात झाला. अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त बसमधून जखमी प्रवाशांना पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये केराबाई ढगे (चिरली वय-४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव, ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी, ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव, ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव, ३२), मोहन मोरकर (चिरली, ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव, ११), रमा कैवारे (चिरली, ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली, ५०), सविता राठोड (जारीकोट, २७), हाजरा पठाण (पिंपळगाव, ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट, ६०), अनुसया स्वामी (जारीकोट, ६०), पार्वती स्वामी, ५५) यांचा समावेश आहे.

स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडला अपघात

सदर अपघात हा स्टेअरिंग लाॅक झाल्यामुळे घडला असल्याची माहिती पुढे येत आहे. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ६८ प्रवासी होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली. परंतु, एसटीच्या अधिकाऱ्यांनी केवळ ५० प्रवासी प्रवास करत होते, असे सांगितले आहे.अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी समोरील काचा फोडण्यात आल्याचे चालक राजू भुजंगा इरलेवाड यांनी सांगितले. तसेच बस चालक राजू भुजंगा इरलेवाड यांच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड