शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

वळण रस्त्यावर बस पलटली, १४ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

By श्रीनिवास भोसले | Updated: August 8, 2023 20:52 IST

अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

बिलोली : उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी मारल्याने १४ प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली आहे.

बिलोली अगाराची बस क्रं. MH 20 BL1903 ही उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी.अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले असून, उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पो.नि. विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये अनुक्रमे केराबाई ढगे (चिरली ४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव ३२), मोहन मोरकर (चिरली ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव ११), रमा कैवारे (चिरली ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली ५०), सविता राठोड (जारीकोट २७), हाजरा पठाण (पिंपळगाव ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट ६०), अनुसया स्वामी (जारीकोट ६०), पार्वती स्वामी ५५) यांचा समावेश आहे.

बिलोली, कुंडलवाडी, उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्ता आणि वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलविले आहे, अशी माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली.

बिलोली अगाराची बस क्रं. एमएच २० बीएल १९०३ ही उमरीहून रावधानोरा मार्गे बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ हा अपघात झाला. अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त बसमधून जखमी प्रवाशांना पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये केराबाई ढगे (चिरली वय-४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव, ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी, ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव, ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव, ३२), मोहन मोरकर (चिरली, ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव, ११), रमा कैवारे (चिरली, ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली, ५०), सविता राठोड (जारीकोट, २७), हाजरा पठाण (पिंपळगाव, ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट, ६०), अनुसया स्वामी (जारीकोट, ६०), पार्वती स्वामी, ५५) यांचा समावेश आहे.

स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडला अपघात

सदर अपघात हा स्टेअरिंग लाॅक झाल्यामुळे घडला असल्याची माहिती पुढे येत आहे. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ६८ प्रवासी होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली. परंतु, एसटीच्या अधिकाऱ्यांनी केवळ ५० प्रवासी प्रवास करत होते, असे सांगितले आहे.अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी समोरील काचा फोडण्यात आल्याचे चालक राजू भुजंगा इरलेवाड यांनी सांगितले. तसेच बस चालक राजू भुजंगा इरलेवाड यांच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड