शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वळण रस्त्यावर बस पलटली, १४ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

By श्रीनिवास भोसले | Updated: August 8, 2023 20:52 IST

अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

बिलोली : उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी मारल्याने १४ प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली आहे.

बिलोली अगाराची बस क्रं. MH 20 BL1903 ही उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी.अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले असून, उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पो.नि. विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये अनुक्रमे केराबाई ढगे (चिरली ४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव ३२), मोहन मोरकर (चिरली ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव ११), रमा कैवारे (चिरली ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली ५०), सविता राठोड (जारीकोट २७), हाजरा पठाण (पिंपळगाव ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट ६०), अनुसया स्वामी (जारीकोट ६०), पार्वती स्वामी ५५) यांचा समावेश आहे.

बिलोली, कुंडलवाडी, उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्ता आणि वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलविले आहे, अशी माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली.

बिलोली अगाराची बस क्रं. एमएच २० बीएल १९०३ ही उमरीहून रावधानोरा मार्गे बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ हा अपघात झाला. अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त बसमधून जखमी प्रवाशांना पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये केराबाई ढगे (चिरली वय-४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव, ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी, ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव, ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव, ३२), मोहन मोरकर (चिरली, ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव, ११), रमा कैवारे (चिरली, ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली, ५०), सविता राठोड (जारीकोट, २७), हाजरा पठाण (पिंपळगाव, ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट, ६०), अनुसया स्वामी (जारीकोट, ६०), पार्वती स्वामी, ५५) यांचा समावेश आहे.

स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडला अपघात

सदर अपघात हा स्टेअरिंग लाॅक झाल्यामुळे घडला असल्याची माहिती पुढे येत आहे. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ६८ प्रवासी होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली. परंतु, एसटीच्या अधिकाऱ्यांनी केवळ ५० प्रवासी प्रवास करत होते, असे सांगितले आहे.अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी समोरील काचा फोडण्यात आल्याचे चालक राजू भुजंगा इरलेवाड यांनी सांगितले. तसेच बस चालक राजू भुजंगा इरलेवाड यांच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड