शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

SSC Result: नांदेडमध्ये दहावीच्या निकालाचा टक्का वाढला; जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल

By प्रसाद आर्वीकर | Updated: May 27, 2024 16:08 IST

दहावीच्या निकालात मुलींच आघाडीवर आहेत

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ९०.३९ टक्के लागला होता. यावर्षी ३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातून यावर्षी ४५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४२ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९९ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील १७ हजार ८१२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. १३ हजार ६४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८३९० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २५११ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. १४९ विद्यार्थ्यांनी खासगी पद्धतीने परीक्षा दिली होती. त्यापैकी १२१ विद्यार्थी (८१.२० टक्के) उत्तीर्ण झाले. तर ७७७ विद्यार्थ्यांनी फेर परीक्षा दिली होती. त्यापैकी ४५६ विद्यार्थी (५८.६८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकालात मुखेड तालुका आघाडीवरदहावीच्या निकालात जिल्ह्यात मुखेड तालुका आघाडीवर आहे. या तालुक्याचा ९८.४० टक्के एवढा सर्वाधिक निकाल लागला आहे. बिलोली तालुक्याचा ९६.६० टक्के, नायगाव तालुक्याचा ९६.५७ टक्के, कंधार तालुक्याचा ९६.४८ टक्के, लोहा ९५.७८ टक्के, अर्धापूर ९५.३१ टक्के, देगलूर ९४.८८ टक्के, उमरी ९३.७६ टक्के, धर्माबाद ९३.४२ टक्के, किनवट ९२.३७ टक्के, भोकर ९२.३० टक्के, नांदेड ९३.२० टक्के, हदगाव ९०.९८ टक्के, मुदखेड ९०.५१ टक्के, माहूर ८७.५६ टक्के आणि हिमायतनगर तालुक्याचा ८६.८५ टक्के निकाल लागला आहे.

दहावीतही मुलींची बाजीबारावी परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात २१ हजार ५०२ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार २८३ मुलींनी परीक्षा दिली. २० हजार ४३४ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०१ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.१८ टक्के एवढे आहे. मुलींनी यावर्षीही निकालात बाजी मारली आहे.

१९७ शाळांचा निकाल १०० टक्केजिल्ह्यातील १६ तालुक्यांतील एकूण शाळांपैकी १९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर कंधार तालुक्यातील झेड.पी. हायस्कूल या एकमेव शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.या शाळेतून दहावी परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याने अर्ज केला होता. मात्र त्यानेही परीक्षा दिली नाही. परिणामी शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालNandedनांदेड