शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

नांदेडमध्ये पाण्यासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:29 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे.

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महापौर दीक्षा धबाले यांनीही पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले असून सोमवारी बैठकीत आढावा घेतला. ईदनिमित्त दोन दिवस मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.विष्णूपुरी प्रकल्पातून झालेल्या अवैध पाणी उपशावर वेळीच निर्बंध न घातल्याने शहराला आता पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. विशेषत: दक्षिण नांदेड तहानलेले आहे. १ जूनपासून महापालिकेने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच पाण्यासाठी नांदेडकरांना चार दिवस वाट पहावी लागत आहे.महापौरपद स्वीकारल्यानंतर दीक्षा धबाले यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाची पहिली बैठक घेतली. यात धबाले यांनी उपलब्ध पाणी किती आणि हे पाणी किती दिवस पुरेल याचा आढावा घेतला. त्यात आता दोन दिवसांवर मुस्लिम बांधवांची ईद आली आहे. या सणासाठी मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात व्हावा याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आढावा बैठकीस सभापती फारुख अली खान, आयुक्त लहुराज माळी, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, नगरसेवक उमेश चव्हाण, दीपक पाटील, किशन कल्याणकर, रमेश गोडबोले, सदाशिव पुरी, फारुख बदवेल, विजय येवनकर, राजू येन्नम, उपअभियंता संघरत्न सोनसळे आदींची उपस्थिती होती.या बैठकीनंतर महापौर दीक्षा धबाले यांनी आयुक्तांसह विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील पंपगृहास भेट दिली. विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेल्याने पंपगृहापर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. या चरातून पाणी पंपगृहापर्यंत सध्या पोहोचत आहे.प्रकल्पातील जिवंत जलसाठ्यातून चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. हा मृतजलसाठा उचलण्यासाठी यंत्र सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. कोटीतीर्थ पंपगृहात आणि काळेश्वर येथील पंपगगृहात सध्या जिवंत जलसाठ्यातील पाणी उचलले जात आहे. त्यानंतर मृत जलसाठा घेतला जाणार आहे. हा मृत जलसाठा नेमका किती आहे? याबाबत स्पष्टपणे सांगायला कोणीही धजावत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मृत जलसाठ्यातून किती दिवस तहान भागेल हाही प्रश्न आहे. या पाहणीदरम्यान, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उमेश पवळे, राजू काळे, किशोर स्वामी, आनंद चव्हाण आदींची उपस्थिती होती.सात वर्षांनंतर मृत जलसाठा उचलणारशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पातून २०१३ मध्ये मृत जलसाठा उचलण्यात आला होता. त्यानंतर २०१९ मध्ये हा मृत जलसाठा उचलण्याची वेळ मनपावर आली आहे. मृत जलसाठा उचलण्यासाठी १० विद्युतपंप तयार ठेवले आहेत. जिवंत जलसाठा संपताच मृत जलसाठा घेतला जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईcommissionerआयुक्तMayorमहापौरvishnupuri damविष्णुपुरी धरण