शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

नांदेडमध्ये पाण्यासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:29 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे.

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महापौर दीक्षा धबाले यांनीही पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले असून सोमवारी बैठकीत आढावा घेतला. ईदनिमित्त दोन दिवस मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.विष्णूपुरी प्रकल्पातून झालेल्या अवैध पाणी उपशावर वेळीच निर्बंध न घातल्याने शहराला आता पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. विशेषत: दक्षिण नांदेड तहानलेले आहे. १ जूनपासून महापालिकेने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच पाण्यासाठी नांदेडकरांना चार दिवस वाट पहावी लागत आहे.महापौरपद स्वीकारल्यानंतर दीक्षा धबाले यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाची पहिली बैठक घेतली. यात धबाले यांनी उपलब्ध पाणी किती आणि हे पाणी किती दिवस पुरेल याचा आढावा घेतला. त्यात आता दोन दिवसांवर मुस्लिम बांधवांची ईद आली आहे. या सणासाठी मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात व्हावा याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आढावा बैठकीस सभापती फारुख अली खान, आयुक्त लहुराज माळी, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, नगरसेवक उमेश चव्हाण, दीपक पाटील, किशन कल्याणकर, रमेश गोडबोले, सदाशिव पुरी, फारुख बदवेल, विजय येवनकर, राजू येन्नम, उपअभियंता संघरत्न सोनसळे आदींची उपस्थिती होती.या बैठकीनंतर महापौर दीक्षा धबाले यांनी आयुक्तांसह विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील पंपगृहास भेट दिली. विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेल्याने पंपगृहापर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. या चरातून पाणी पंपगृहापर्यंत सध्या पोहोचत आहे.प्रकल्पातील जिवंत जलसाठ्यातून चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. हा मृतजलसाठा उचलण्यासाठी यंत्र सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. कोटीतीर्थ पंपगृहात आणि काळेश्वर येथील पंपगगृहात सध्या जिवंत जलसाठ्यातील पाणी उचलले जात आहे. त्यानंतर मृत जलसाठा घेतला जाणार आहे. हा मृत जलसाठा नेमका किती आहे? याबाबत स्पष्टपणे सांगायला कोणीही धजावत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मृत जलसाठ्यातून किती दिवस तहान भागेल हाही प्रश्न आहे. या पाहणीदरम्यान, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उमेश पवळे, राजू काळे, किशोर स्वामी, आनंद चव्हाण आदींची उपस्थिती होती.सात वर्षांनंतर मृत जलसाठा उचलणारशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पातून २०१३ मध्ये मृत जलसाठा उचलण्यात आला होता. त्यानंतर २०१९ मध्ये हा मृत जलसाठा उचलण्याची वेळ मनपावर आली आहे. मृत जलसाठा उचलण्यासाठी १० विद्युतपंप तयार ठेवले आहेत. जिवंत जलसाठा संपताच मृत जलसाठा घेतला जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईcommissionerआयुक्तMayorमहापौरvishnupuri damविष्णुपुरी धरण