शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

वाळू उपसा रोखणारी विशेष पथके कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:51 IST

जिल्ह्यात अवैध आणि ज्या घाटावर परवानगी दिली आहे तिथे नियमांचे उल्लंघन करुन वाळू उपसा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना कागदावरच दिसत असून वाळू घाटांची क्रॉस तपासणी करण्याचा निर्णय एप्रिल अखेर प्रशासनाने घेतला होता.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट तीव्रदुसरीकडे वाळू उपशालाही यंत्राच्या सहायाने मोठी गती

अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यात अवैध आणि ज्या घाटावर परवानगी दिली आहे तिथे नियमांचे उल्लंघन करुन वाळू उपसा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना कागदावरच दिसत असून वाळू घाटांची क्रॉस तपासणी करण्याचा निर्णय एप्रिल अखेर प्रशासनाने घेतला होता. मे अखेरपर्यंत मात्र एकाही पथकाने कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे वाळू घाटावर सर्रासपणे जेसीबी मशिनचा वापर केला जात आहे.जिल्ह्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने प्रारंभी धाडसी कारवाई केली होती. नांदेड तसेच मुदखेड तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या सक्शन पंपांना थेट जिलेटीन कांड्याच्या स्फोटाने नष्ट करण्यात आले होते. त्याचवेळी नांदेड तालुक्यात २४ तास वाळूघाटावर पथके ठेवण्याचा निर्णयही घेतला होता. घाटावर तंबू लावून वाळू चोरी थांबवण्याचा निर्णयही घेतला होता.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी पथक त्या त्या तालुक्यात नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या पथकात मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका कर्मचा-याचा समावेश होता.तसेच नायब तहसीलदार हे आपला तालुका सोडून दुस-या तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी करणार होते. या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करणेही बंधनकारक करण्यात आले होते. जिल्हास्तरीय विशेष पथकासह उपविभागीय अधिका-यांच्या नेतृत्वाखालील पथकही गठीत करण्यात आले होते. हे पथक दुस-या तालुक्यात जावून वाळू घाटांची अचानक पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पथकात तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश केला होता.जिल्ह्यात जवळपास १२ वाळू घाटांना परवानगी दिली असून या वाळू घाटावर उपसा सुरूच आहे. हा उपसा करताना थेट जेसीबीचा वापर केला जात आहे. वाळूघाट सुरू होण्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील काही घाटांवर उपविभागीय अधिका-यांनी कारवाई केली. मात्र पुन्हा त्या ठिकाणी जेसीबी अवतरल्या आहेत. या जेसीबीची संख्या मोठी आहे.मध्यंतरी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत महसूल आणि पोलिस प्रशासन गुंतले होते. हीच बाब लक्षात घेवून वाळू माफियांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपले जाळे पसरले आहे.जिल्ह्यात एकीकडे टंचाईने भीषण रुप धारण केले असताना जिल्ह्यातील नद्यांमधून मात्र मोठ्या प्रमाणात यंत्रांच्या सहाय्याने महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून जेसीबी मशिनने तसेच अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. या वाळू उपशाने भूजलपातळी दिवसेंदिवस खालावली जात आहे. या बाबीकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्षच करीत आहे. जिल्ह्यात परवानगी नसलेल्या घाटावरुन वाळू उपसा सुरू आहेच. त्याचवेळी थेट विष्णूपुरी प्रकल्पाच्या जवळूनही वाळू उपसा सुरू आहे.जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या विशेष पथकांकडून निवडणुकानंतर तरी आता कारवाई केली जाईल का? याकडे लक्ष लागले आहे.जिल्हाधिका-यांच्या कारवाईनंतरही ‘जैसे थे’जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ३ मे रोजी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २७ वाळूच्या गाड्या तपासल्या होत्या. या गाड्या बिलोली तालुक्यातील सगरोळी घाटावरुन रेती घेऊन जात होत्या. या २७ पैकी एकही अधिकृत पावती नव्हती. सर्व पावत्या बोगस आढळून आल्या. गुन्हेही दाखल झाले. पुढे मात्र सगरोळी येथून वाळू उपसा जैसे थे सुरुच आहे.देगलूर तालुक्यातील लेंडी नदीवर असलेल्या तमलूर वाळू घाटावरही रात्रं-दिवस जेसीबी मशिनने वाळू उपसा सुरू आहे. देगलूर तहसीलदार तसेच त्या विभागाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातून येथे कारवाई झालीच नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेले विशेष पथके कागदावरच दिसून येत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी