शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

... तर पालकमंत्र्यांचे कामच काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:47 IST

महापालिकेने कामे सुचवायची, प्रस्ताप पाठवायचा अन् ती पालकमंत्र्यांनी मंजूर करायची, असे असेल तर पालकमंत्र्यांचे कामच काय? असा प्रतिप्रश्न करीत पालकमंत्री रामदास कदम यांनी दलित वस्ती निधी नियोजनातील आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देरामदास कदम: कामे अंतिम करण्याचा निर्णय माझाच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेने कामे सुचवायची, प्रस्ताप पाठवायचा अन् ती पालकमंत्र्यांनी मंजूर करायची, असे असेल तर पालकमंत्र्यांचे कामच काय? असा प्रतिप्रश्न करीत पालकमंत्री रामदास कदम यांनी दलित वस्ती निधी नियोजनातील आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.दलित वस्ती निधीतील महापालिकेने सुचवलेली कामे रद्द करुन नवीन कामे समाविष्ट करण्याच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाचा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला. प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारीही दर्शविली. या विषयावर सोमवारी नांदेड दौºयावर आलेल्या पालकमंत्री रामदास कदम यांची प्रतिक्रिया घेतली असता, दलित वस्ती निधीच्या कामांना मंजुरी देताना दलित वस्तीमध्येच ही कामे व्हावीत, यासाठी प्राधान्य दिले आहे. यापूर्वी दलित वस्ती निधीतून इतर ठिकाणची कामे सुचवण्यात आली होती. त्यामुळे हा निधी परत गेला होता. पुन्हा तो परत जावा, अशी आपली इच्छा नाही. त्याचवेळी महापालिकेच्या एकाही सदस्याचा प्रस्ताव आपल्याकडे आला नाही. सदस्यांनी कामेही सुचवले नाहीत.महापालिकेने ठराव घ्यायचा आणि कामांची यादी पालकमंत्र्यांकडे द्यायची आणि पालकमंत्र्यांनी त्याला मंजुरी द्यायची असे होत नाही. पालकमंत्र्यांनाही अधिकार आहेत. त्या अधिकारांचा आपण वापर केला आहे. या विषयात कोणाला न्यायालयाला जायचे असेल तर त्यांनी लवकर जावे, असा सल्लाही दिला.२०१७-१८ वर्षामध्ये सुचवलेल्या १५ कोटींच्या कामात सर्व कामे दलित वस्ती मधीलच आहेत की नाही? ही बाब तपासण्याचे आदेशही त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिले. महापालिकेने सुचवलेली कामेच मंजूर करावी, हा प्रकार चोरांच्या उलट्या बोंबा, असाच आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.आ. हेमंत पाटील परदेशात..!पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या १७ कामामध्ये नवीन नांदेडातील जवळपास पावनेतीन कोटींच्या कामाचा समावेश आहे तर पालकमंत्र्यांनी सुचवलेले नवीन १७ कामे ही उत्तर मतदार संघातच आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी दक्षिण-उत्तर ही बाब मी लक्षात घेतली नाही. दलित वस्तीतील कामे केवळ योग्य ठिकाणी व्हावे, या दृष्टीने निर्णय घेतला आहे. दक्षिण मतदार संघातील कामे रद्द झाले असतील तर आ. हेमंत पाटीलांनी नाराज व्हायचे काहीही कारण नाही. ते सुचवतील तेच आपण करत आहोत, असेही पालकमंत्री कदम म्हणाले. आज ते परदेशात असल्यामुळे बैठकीला उपस्थित नसल्याचा खुलासाही केला.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमMuncipal Corporationनगर पालिका