शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सिंदखेड पोलीस ठाणे स्थलांतराचे कोडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:32 IST

काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

श्रीक्षेत्र माहूर / वाई बाजार : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले निजामकालीन सिंदखेड पोलीस ठाण्याची जीर्ण इमारत, त्यातच कोणत्याही भौतिक सुविधेविना पोलीस कर्मचाऱ्यांंना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत पाहता मागील काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.एकेकाळी विजयकुमार नामक नक्षलवाद्याच्या नक्षली कारवायामुळे चर्चेत आलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या या इमारतीचे बांधकाम निजामकालीन आहे. वाई बाजार, सारखणी या मुख्य रहदारीच्या बाजार पेठेसह एकूण ५२ गावच्या सुरक्षेची जबाबदारी याच सिंदखेड पोलिस ठाण्याकडे आहे. माहूर-किनवट राज्य मार्गापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या या जीर्ण ठाणे इमारतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधेशिवाय कर्मचाºयांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. दरम्यान, एका सहायक पोलिस निरिक्षकासह एकूण ३२ कर्मचाºयांची नियुक्ती आहे. त्यापैकी ३ पोलीस कर्मचारी न्यायालयीन कामकाज, ३ कर्मचारी समंस व वारंट तामील करण्यासाठी, १ आमदारांचे अंगरक्षक, तर कर्मचारी ३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. परिणामी उर्वरीत २२ कर्मचारी हे ५२ गावात वसलेल्या २६ हजार लोकसंख्येच्या सुरक्षेची खबरदारी घेत आहेत. कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतांना देखील पुरक सोयी सुविधांअभावी कर्तव्य पार पाडतांना कर्मचारी वर्गाचे मानसिक संतुलन बिघडणे स्वाभाविकच आहे.याबाबत अनेकवेळा निवेदने व पाठपुरावा करून भौतिक सुविधेसाठी ठाणे इतरत्र हलवण्याची मागणी झाली. परंतु आदिवासी व दुर्गम भागातील सिंदखेड पोलिस ठाणे इतरत्र हलवण्याची प्रक्रिया अद्यापही दुर्लक्षितच आहे.भौतिक सुविधेअभावी दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या सिंदखेड पोलिस ठाण्यास गृह विभागामार्फत सोईच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी मागील काळात हालचाली झाल्या़ परंतु अद्याप स्थलातराची कार्यवाही शुन्यच आहे. त्यातच अपुºया संख्याबळावर दुर्गम भागातून कायदा व सुव्यवस्थेची अत्यावश्यक सेवा देणे सिंदखेड पोलिसांना अवघड बनले असून प्रसंगी तारेवरची कसरत ठरते.जनतेच्या सेवातत्परतेसाठी पोलीस ठाणे मोक्याच्या ठिकाणी असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. पोलिस ठाणे वाईबाजार सारख्या मोक्याच्या ठिकाणी असल्यास नागरीकांना तत्पर सेवा देणे शक्य होईल़ तसेच पोलीस कर्मचाºयांचीही हेळसांड होणार नाही. त्यामुळे ठाणे स्थलांतर करावे, अशी मागणी आहे़

वाई बाजार येथे पोलीस ठाणे स्थलांतरीत केल्यास वाई बाजारसह परिसरातील छुप्या पध्दतीने सुरू असलेले अवैध व्यवसायावर अंकुश लागेल. सोबतच अतिसंवेदनशील म्हणून गणल्या जाणा-या वाईबाजार मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पोलीस कर्मचा-यांना कर्तव्यात भौतिक अडचणी येणार नाहीत. यासाठी वाईबाजार हेच योग्य ठिकाण आहे - बाबाराव कंधारे, सामाजिक कार्यकर्ता, वाई बाजार

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसPolice Stationपोलीस ठाणे