शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

सिंदखेड पोलीस ठाणे स्थलांतराचे कोडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:32 IST

काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

श्रीक्षेत्र माहूर / वाई बाजार : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले निजामकालीन सिंदखेड पोलीस ठाण्याची जीर्ण इमारत, त्यातच कोणत्याही भौतिक सुविधेविना पोलीस कर्मचाऱ्यांंना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत पाहता मागील काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.एकेकाळी विजयकुमार नामक नक्षलवाद्याच्या नक्षली कारवायामुळे चर्चेत आलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या या इमारतीचे बांधकाम निजामकालीन आहे. वाई बाजार, सारखणी या मुख्य रहदारीच्या बाजार पेठेसह एकूण ५२ गावच्या सुरक्षेची जबाबदारी याच सिंदखेड पोलिस ठाण्याकडे आहे. माहूर-किनवट राज्य मार्गापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या या जीर्ण ठाणे इमारतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधेशिवाय कर्मचाºयांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. दरम्यान, एका सहायक पोलिस निरिक्षकासह एकूण ३२ कर्मचाºयांची नियुक्ती आहे. त्यापैकी ३ पोलीस कर्मचारी न्यायालयीन कामकाज, ३ कर्मचारी समंस व वारंट तामील करण्यासाठी, १ आमदारांचे अंगरक्षक, तर कर्मचारी ३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. परिणामी उर्वरीत २२ कर्मचारी हे ५२ गावात वसलेल्या २६ हजार लोकसंख्येच्या सुरक्षेची खबरदारी घेत आहेत. कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतांना देखील पुरक सोयी सुविधांअभावी कर्तव्य पार पाडतांना कर्मचारी वर्गाचे मानसिक संतुलन बिघडणे स्वाभाविकच आहे.याबाबत अनेकवेळा निवेदने व पाठपुरावा करून भौतिक सुविधेसाठी ठाणे इतरत्र हलवण्याची मागणी झाली. परंतु आदिवासी व दुर्गम भागातील सिंदखेड पोलिस ठाणे इतरत्र हलवण्याची प्रक्रिया अद्यापही दुर्लक्षितच आहे.भौतिक सुविधेअभावी दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या सिंदखेड पोलिस ठाण्यास गृह विभागामार्फत सोईच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी मागील काळात हालचाली झाल्या़ परंतु अद्याप स्थलातराची कार्यवाही शुन्यच आहे. त्यातच अपुºया संख्याबळावर दुर्गम भागातून कायदा व सुव्यवस्थेची अत्यावश्यक सेवा देणे सिंदखेड पोलिसांना अवघड बनले असून प्रसंगी तारेवरची कसरत ठरते.जनतेच्या सेवातत्परतेसाठी पोलीस ठाणे मोक्याच्या ठिकाणी असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. पोलिस ठाणे वाईबाजार सारख्या मोक्याच्या ठिकाणी असल्यास नागरीकांना तत्पर सेवा देणे शक्य होईल़ तसेच पोलीस कर्मचाºयांचीही हेळसांड होणार नाही. त्यामुळे ठाणे स्थलांतर करावे, अशी मागणी आहे़

वाई बाजार येथे पोलीस ठाणे स्थलांतरीत केल्यास वाई बाजारसह परिसरातील छुप्या पध्दतीने सुरू असलेले अवैध व्यवसायावर अंकुश लागेल. सोबतच अतिसंवेदनशील म्हणून गणल्या जाणा-या वाईबाजार मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पोलीस कर्मचा-यांना कर्तव्यात भौतिक अडचणी येणार नाहीत. यासाठी वाईबाजार हेच योग्य ठिकाण आहे - बाबाराव कंधारे, सामाजिक कार्यकर्ता, वाई बाजार

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसPolice Stationपोलीस ठाणे