शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

मापात पाप अन् शेतकऱ्याला ताप; कापूस खरेदी करताना व्यापाऱ्याकडून वजनकाट्यात फेरफार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:56 IST

काट्यातील ही फेरफार गजानन मेश्राम या शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

ठळक मुद्देप्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्याचा साधारणता दहा किलो कापूस अधिक जात होता.

नांदेड : माहूर तालुक्यातील अंजनी येथे व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना इलेक्ट्राॅनिक वजनी काट्यात फेरफार करून मापात पाप केले. एक क्विंटल कापसाच्या मागे साधारणता १० किलो कापूस जास्त घेऊन शेतकऱ्यांना ११ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

कृषी कायद्याच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरू आहे. त्यात शेत मालाला भावही मिळत नाही. त्यामुळे मागेल त्या व्यापाऱ्याकडे शेतकरी आपला माल घेऊन जात आहेत. अंजनी येथील शेतकऱ्यांनी रबी हंगामातील कापूस विक्रीसाठी आणला होता. यावेळी व्यापाऱ्याने त्यांना योग्य भाव देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कापूस खरेदी केला. त्यासाठी इलेक्ट्राॅनिक काट्याचा वापर करण्यात आला; परंतु काट्यात त्यासाठी फेरफार करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्याचा साधारणता दहा किलो कापूस अधिक जात होता. अशाप्रकारे व्यापाऱ्याने जवळपास ९०० क्विंटल कापूस खरेदी केला; परंतु काट्यातील ही फेरफार गजानन मेश्राम या शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वणवण सुरूचपरतीच्या पावसाने अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीन, मूग, उडीद यासह हातात असलेली पीके वाया गेली आहेत. त्यात आता पांढऱ्या सोन्याने कसा बसा हातभार लावला होता. परंतु त्यालाही भाव पाडून मागण्यात येत आहेत. बाजारपेठेत हा कापूस विक्रीसाठी नेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अशाप्रकारे लुट करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे इलेक्ट्रानिक काटे आहेत. त्यामुळे या सर्व काट्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी व्यापार्यांनी अशाप्रकारे काट्यात फेरफार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीNandedनांदेड