शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वरचे पाणी विष्णूपुरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:28 IST

शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेतलेले १० दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात येण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांत जवळपास १ दलघमी पाणी पोहोचले असून कॅनॉलद्वारे पाणी घेण्यात येत असल्याने संथगतीने पोहोचत आहे.

ठळक मुद्देमहापालिका : नांदेडची तहान भागविण्यासाठी पाण्याची मागणी, कॅनॉलद्वारे ६० किलोमीटर अंतराहून येत आहे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेतलेले १० दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात येण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांत जवळपास १ दलघमी पाणी पोहोचले असून कॅनॉलद्वारे पाणी घेण्यात येत असल्याने संथगतीने पोहोचत आहे.नांदेड शहरासाठी पूर्णा पाटबंधारे विभागाच्या सिद्धेश्वर प्रकल्पात १० दलघमी पाणी राखीव ठेवण्यात आले होते. नांदेड शहरासाठीच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता १५ एप्रिलपासून सिद्धेश्वर प्रकल्पातून १० दलघमी पाणी घेण्यास प्रारंभ झाला आहे. हे पाणी १८ एप्रिल रोजी विष्णूपुरी प्रकल्पात दाखल झाले आहे. सिद्धेश्वर, पूर्णा, वसमत, तळणी, नाळेश्वरपर्यंत जवळपास ६० किलोमीटर अंतराहून पाणी कॅनॉलद्वारे आणले जात आहे. नाळेश्वरहून नाल्यामार्गे गोदावरी नदीत पाणी घेतले जात आहे. हे पाणी १५ एप्रिलपासून सोडण्यात आले आहे.या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पाटबंधारे विभाग तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्याचवेळी विद्युत पुरवठाही खंडित केला जात आहे. कार्यकारी अभियंता आर.एन. देशमुख, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता निळकंठ गव्हाणे, उप अभियंता बोधनकर आदी अधिकारी, कर्मचारी या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत.नांदेड शहरासाठी असलेली पर्यायी पाणीपुरवठा योजनाही सध्या सुरु आहे. इसापूरचे दोन दलघमी पाणी ८ एप्रिल रोजी पोहोचले होते. या पाण्यातून २५ दिवसांची तहान भागणार आहे.इसापूरमधून आणखी अडीच दलघमी पाणी मे महिन्यामध्ये घेतले जाणार आहे. विष्णूपुरी आणि आसनेत उपलब्ध होणाºया पाण्यातून नांदेडकरांना उन्हाळ्यात पाणी देण्याची व्यवस्था महापालिका करीत आहे. यापूर्वीच नियोजन केल्यामुळे सध्यातरी पाण्याचा प्रश्न उद्भवला नसल्याचे दिसत आहे.मात्र पावसाळा लांबल्यास जूनमध्ये पाण्याची अडचण उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शहरात आजघडीला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या वेळापत्रकात सध्यातरी कोणताही बदल अपेक्षित नसल्याचेही मनपा पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शहरातील काही भागांत अद्यापही पाण्यासाठी ओरड सुरु आहे. वेळीअवेळी पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जलवाहिनीतील गळती, कर्मचाºयांची कमतरता आदी बाबींमुळे पाणीपुरवठा वेळापत्रक विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, यापूर्वी १२ मार्च रोजी दिग्रस बंधाºयातून २५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात घेण्यात आले होते. त्यावेळी सिंचनाच्या नियोजित पाणी पाळ्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्याने तळ गाठला होता.त्या पार्श्वभूमीवर इसापूर प्रकल्पातून महापालिकेने २ दलघमी पाणी आसना नदीत घेऊन पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराची तहान भागविली होती.१० दलघमी पाण्याची मागणीविष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ८ दलघमी पाणी उपलब्ध आहे. सिद्धेश्वरमधून घेण्यात येणाºया १० दलघमीपैकी ५ दलघमी पाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे. पाणी येतानाचे लॉसेस मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याचवेळी महापालिकेने लॉसेस वगळता विष्णूपुरी प्रकल्पात १० दलघमी पाणी पोहोचेल इतके पाणी सोडावे, अशी मागणी केल्याचे कार्यकारी अभियंता अंधारे यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकvishnupuri damविष्णुपुरी धरण