शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्यामसुंदर शिंदे यांनी गुन्ह्याची माहिती दडविल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 04:05 IST

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून निवडून आलेले निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर दगडुजी शिंदे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध नोंदविलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची माहिती न दिल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी, अशी विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना करण्यात आली आहे.शेतकरी कामगार पक्षातर्फे विजयी झालेले एकमेव उमेदवार असलेल्या शिंदे यांनी नंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ठाणे येथील एक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी शिंदे यांच्याविरुद्ध ही तक्रार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. त्यांची निवडणूक रद्द करण्याखेरीज त्यांच्यावर फौैजदारी कारवाई करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.वाटेगावकर यांच्या म्हणण्यानुसार, ओशिवरा येथील भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या ‘एसआयटी’ने केलेल्या तपासानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सन २०१७ मध्ये भ्रष्टाचार निर्मूलन कायदा तसेच भारतीय दंड विधानान्वये गुन्हा नोंदविला. त्यात समीर व पंकज भुजबळ यांच्याखेरीज श्यामसुंदर शिंदे यांनाही आरोपी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंकज भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून आताची विधानसभा व समीर भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघातून गेली लोकसभा निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जांसोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रांत या गुन्ह्याची स्पष्ट नोंद केली आहे. मात्र त्याच प्रकरणात सहआरोपी असूनही शिंदे यांनी मात्र निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्याची माहिती दडवून ठेवली आहे.अंजली दमानिया यांनी केलेल्या जनहित याचिकेवर ज्या एकूण ११ प्रकरणांच्या तपासाचा आदेश उच्च न्यायालयाने दिला त्यात ओशिवºयाचे हे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या तपासात हेतुपुरस्सर चालढकल करण्यात येत असल्याबद्दल वाटेगावकर यांनी स्वतंत्र जनहित याचिका केली आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग