शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे मानकरी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:49 AM

दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.

कंधार : दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगावची खंडोबा यात्रा आपल्या खास वैशिष्ट्याने उत्तर भारतातील भाविक - भक्तांचे आकर्षण ठरले आहे. उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी आपला घोडेबाजार आता सर्वांना आकर्षण वाटणारा निर्माण केला आहे. पूर्वीचे यात्रेचे स्वरूप आता कालौघात बदलले आहे. महिनाभरची यात्रा मोजक्या दिवसांवर आली. परंतु, यात्रेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाने कलावंत, भाविक, शेतकरी, शेतमजूर, भटके विमुक्त आदींसाठी नानाविध कार्यक्रम एक मेजवाणी ठरते.यात्रा परिसर, मंदिर परिसर, धर्मशाळा, पालखी रस्ता, पशुधन शेड, सभामंडप, वाहनतळ, भोजनगृह आदींची सोयी झाली आहे. माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांनी विकासासाठी मोठा निधी दिला. त्यामुळे अनेक कामे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निधी उपलब्ध करून दिला. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावा केला. यात्रा विकासासाठी प्रयत्न केले. या कामात मात्र मानकरी दुर्लक्षित राहिले, अशीच परिस्थिती आहे.यात्रेची सुरूवात करणारे, पागोटे (मुंडासे) मुख्य पालखीत ठेवल्या शिवाय पालखी मिरवणूक निघत नाही. सट व देवस्वारी या दोन्हीवेळी पानभोसीच्या भोसीकर कुटुंबाचा ‘मुंडासेमान’ असतो. आणि नवीन मुंडासे वस्त्र कुरूळा येथील महाजन आणतात. छत्रीचे मानकरी शिराढोण येथील पांडागळे हे आहेत. मुख्य पालखीसमोरची पालखी मानकरी हे रिसनगावचे नाईक आहेत. या मानकºयाशिवाय यात्रा अपूर्ण आहे. परंतु, या मानकºयांना माळेगावात अद्याप पक्का निवारा उपलब्ध करून देता आला नाही. स्वत: व गावातील सोबत आलेल्या भाविक - भक्तांना राहुटीत गारठ्यात रात्र काढावी लागते. पदरमोड करून गावकºयांना दिलासा द्यावा लागतो. कोटीचा खर्च, विविध बांधकामे होत असताना मानकरी केंद्रस्थानी येणे गरजेचे आहे. मात्र आजपर्यंत तसे झाले नाही. आता रिसनगावच्या नाईकांना २५ लाखांतून सभागृह बांधून दिले जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. इतर तीन मानकºयांना असा योग कधी येणार? असा सवाल मानक-यांच्या गावातून व भाविक - भक्तांतून केला जात आहे.

पक्का निवारा नसल्याने मानक-यांची परवडमुंडासे (पागोटे), पूजा अर्चा, अभिषेक आदींचा मान अनेक पिढीपासून कुटुंबाकडे आहे. यात्राकाळात गावकºयांसोबत शेकडो जण असतात. परंतु, निवारा पक्का नसल्याने त्रास होतो. खर्च पदरमोड करावा लागतो. आता सततच्या दुष्काळाने आर्थिक ताण सहन होत नाही. निवारा व खर्च तरतूद केली तर सोयीचे होईल - खुशालराव भगवानराव पा.भोसीकर, पानभोसी ता.कंधारश्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत मानक-यांना निवारा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. रिसनगावच्या नाईक यांना मुख्यमंत्री निधीतून २५ लाखांचे सभागृह मंजूर झाले आहे. इतर मानकºयांना तशी सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायतचा पाठपुरावा निवेदनाद्वारे करणार आहे -विजय वाघमारे (ग्रामपंचायत सदस्य, माळेगाव, ता.लोहा)

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळे