शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

थोडक्यात महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

बिलोली - येथील अमोलनगर भागातील ११ केव्हीहून जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे पोल गांधीनगर, रवींद्रनगर या भागातून नेण्यासाठी कंत्राटदारांनी खड्ड्यांचे खोदकाम सुरू ...

बिलोली - येथील अमोलनगर भागातील ११ केव्हीहून जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे पोल गांधीनगर, रवींद्रनगर या भागातून नेण्यासाठी कंत्राटदारांनी खड्ड्यांचे खोदकाम सुरू केले आहे. या खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बहुसंख्य पोल हे मुख्य रस्त्यालगत करण्यात येत असल्यामुळे रस्त्याची रूंदी कमी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

मनमानी भावाने बियाणे विक्री

बरबडा - बरबडा व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खत व बियाणांची गरज असल्याने कृषी दुकानांवर गर्दी होत आहे. मात्र, सरकारने खतांच्या किमतीत वाढ केल्यामुळे कृषी दुकानदारांनी खते व बियाणांचा तुटवडा असल्याचे दाखवून मनमानी भाव लावून शेतकऱ्यांची लूट चालवली आहे. ही लूट थांबविण्याची मागणी गजानन शिंदे, संभाजी पाटील शिंदे, माणिक चव्हाण, सुनील लुंगारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे बांगडी व्यवसाय संकटात

नरसीफाटा - सलग दुसऱ्या वर्षीही बांगडी व्यवसाय संकटात सापडला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून इतर व्यवसाय करता येतात; परंतु बांगडी व्यवसाय मात्र सुरक्षित अंतर ठेवून करता येत नसल्यामुळे बांगडी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. यंदाच्या लग्नसराईत हा व्यवसाय बंद असल्यामुळे बांगडी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

इंटरनेट बँकिकंगची सुविधा सुरू करा

किनवट - भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांची संख्या पाहता इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे ग्राहकांना बँकेत न जाता अनेक व्यवहार करता यावेत, बँकेत गर्दी निर्माण होऊ नये, या दृष्टीने या सुविधेचा लाभ देण्यात आला परंतु किनवट येथील भारतीय स्टेट बँकेने या सुविधेपासून ग्राहकांना वंचित ठेवले आहे. ही सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.

राजगड तलावाला भेट

किनवट - उपविभागीय अधिकारी कार्यालय व लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग किनवटद्वारे किनवट व माहूर तालुक्यातील सिंचन तलाव, पाणर तलाव यांचे लोकसहभागातून गाळ उपसा करण्यासाठी ९ एप्रिलला आवाहन केले होते; परंतु या आवाहनास राजगड येथील तलावाचा समावेश नव्हता. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी या तलावाला भेट देऊन पाहणी केली.

कुंडलवाडीत निर्जंतुकीकरण फवारणी

कुंडलवाडी - शहरात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे माजी आ. सुभाष साबणे यांच्या पुढाकारातून १७ मे रोजी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दुसऱ्या लाटेत मोठी संख्या वाढली होती. देगलूर-बिलोली मतदारसंघात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन त्यात अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुंडलवाडीत निर्जंतुकीकरण करण्यात आले.

दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष

बिलोली - जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दूरसंचार विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सीमावर्ती भागातील जनतेने याबाबत दूरसंचार विभागाच्या अडचणीविषयी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. बीएसएनएल सेवेविषयी नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आला. केबलचे दुरुस्तीचे कारण देऊन वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

एनएचएमआय अंतर्गत कामे

लोहा - एनएचएमआय अंतर्गत लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत फुटपाथसहीत चौपदरीकरण रस्ता होणार असल्याची माहिती खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. लोहा तालुक्यातील नांदेड-लोहा महामार्गावर कारेगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, एनएचएमआय अंतर्गत कामांना गती देण्यात आली आहे.

खते खरेदी करताना जागरूक रहावे

कंधार - खरीप हंगामात कृषी निविष्ठा मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना जागरूक राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य देण्यात यावे, बनावट भेसळयुक्त बियाणे, खते खरेदी टाळण्यासाठी विक्रेत्याकडून पावतीसह कृषी निविष्टांची खरेदी करणे आवश्यक आहे.

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा

बिलोली - यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याने तालुका पातळीवर सर्व विभागप्रमुखांनी खबरदारीचा उपाय म्हणून मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावे, अशी सूचना तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिली आहे. मंगळवारी येथील तहसील कार्यालयात गटविकास अधिकारी, तालुका कृषी कार्यालय, वीज वितरण विभाग व अन्य विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.

सिडकोत गढूळ पाणी

नांदेड - सिडको नवीन नांदेडला गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात आला. गढूळ आणि मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने भरावे लागत आहे. काही भागांत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांना पैसे खर्च करून पाणी घ्यावे लागले. एकीकडे कोरोनाची भीती असताना नागरिक मात्र पाण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.

मिरेवाड यांच्या काव्यसंग्रहास पुरस्कार

नायगाव - प्रसिद्ध कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या माती शाबूत राहावी म्हणून या काव्यसंग्रहास पुणे येथील विष्णुपंत ताम्हणे विद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा हडपसर येथे कवी चंद्रकांत जोगदंड यांनी केली. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे. या यशाबद्दल मिरेवाड यांचे स्वागत होत आहे.