शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

नांदेड येथून शिवशाही केवळ हैदराबादला; प्रशासनाचा पुणे, मुंबईकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:13 IST

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासनाने नव्याने गाडी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले़

नांदेड : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासनाने नव्याने गाडी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले़ त्याचप्रमाणे एसटी प्रशासनानेदेखील पुणे, मुंबई मार्गाकडे कानाडोळा केला आहे़ हैदराबादकडे शिवशाही सोडण्यात काही अधिकार्‍यांचे खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत असलेले हितसंबंध कारणीभूत असल्याची चर्चा महामंडळात होत आहे़ 

नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने रात्रीला धावणारी नांदेड-पुणे, पूर्णा-अंजनी (नागपूर) एक्स्प्रेस बंद करून खासगी ट्रॅव्हल्सच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा करून दिला़ रेल्वेच्या पावलावर पाऊल ठेवत एसटीच्या अधिकार्‍यांनी  नांदेड येथून पुणे, मुंबई, नागपूर, लातूर मार्गावर शिवशाही सोडण्याकडे दुर्लक्ष केले़ नांदेड विभागाला मिळालेल्या सहाला सहा शिवशाही बस प्रवासी नसलेल्या हैदराबाद मार्गावर सोडण्यात येत आहेत़ 

नांदेड येथून पुणे, नागपूर, मुंबईसाठी रात्रीच्या वेळेला स्वतंत्र रेल्वे नसल्याने या मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावतात़ रेल्वेसाठी मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीसह अनेक संघटना, कार्यकर्त्यांनी आंदोलनेदेखील केली़ परंतु, रेल्वे अधिकारी आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने मुंबई, पुण्यासाठी नांदेडातून रेल्वे सुरू केली जात नसल्याचा आरोप  खासदारांनी रेल्वे महाप्रबंधकांच्या बैठकीत केला होता़  

नांदेडातून हैदराबाद जाण्यासाठी अनेक रेल्वेसह विमानसेवादेखील उपलब्ध आहे़ शिवशाहीच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट अत्यल्प असल्याने आणि रेल्व प्रवास  सुरक्षित असल्याने बहुतांश प्रवासी रेल्वेनेच प्रवास करतात़ मागणी नसताना एसटी अधिकार्‍यांनी शिवशाही हैदराबादकडे वळविली़ त्यामुळे रेल्वे अधिकार्‍यांप्रमाणे एसटी अधिकार्‍यांचे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी अर्थपूर्ण संबंध तर नाहीत ना, असा प्रश्न इंटकचे विभागीय सचिव पी़आऱइंगळे यांनी उपस्थित केला आहे़ भाडेतत्त्वावर घेतलेल्या सहा शिवशाही गाड्या नांदेड विभागाला दिल्या़ २२ जानेवारी रोजी उद्घाटनानंतर मार्गस्थ झालेल्या गाड्यांना तेलंगणा चेक पोस्टवर अडविले. दरम्यान, काही तासानंतर एसटी अधिकार्‍यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून निजामाबाद आरटीओंकडून परवानगी घेतती़ परंतु, यात भरपूर वेळ गेल्याने सकाळच्या गाड्या बिलोली ते हैदराबाद रद्द करण्यात आल्या़ मात्र, सायंकाळी सोडण्यात येणार्‍या तीनही गाड्या हैदराबादपर्यंत धावल्या़

शिवशाही गाड्या येऊनही पुणे-मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांचे हाल सुरुच आहेत़ या मार्गावर मोजक्याच रेल्वे धावतात़ त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहत नाही़ खाजगी ट्रॅव्हल्ससोबत स्पर्धा करण्यासाठी पुणे-मुंबईसाठी शिवशाही सोडण्याची मागणी आहे.नांदेड येथून पुण्यासाठी सकाळी सहा वाजता केवळ एकच बस धावते़ त्या बसला चांगला प्रतिसाद आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणार्‍यांची संख्या अधिक आहे़ परंतु, हा विचार न करता हैदराबादसाठी शिवशाही सोडल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत़नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयाने शिवशाही बससेवेचे नांदेड - हैदराबाद तिकिट ४९५ रूपये निर्धारित केले आहे़ नांदेड ते हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेचे एसटी थ्री टायरचे तिकीटदेखील ४९५ रूपये आहे़ परंतु, स्लीपर कोचचे १९० रूपये तर पॅसेंजर गाडीने केवळ १३० रूपयांत हैदराबादला पोहोचतात़ एसटीचा प्रवास दगदगीचा असल्याने प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात.

टॅग्स :NandedनांदेडShivshahiशिवशाही