शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

किनवट तालुक्यावर दुष्काळाची छाया; २१ प्रकल्पांपैक्की ५ मृत तर इतरांमध्ये २० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:49 IST

किनवट तालुक्यातील २१ पैकी पाच प्रकल्पांतील जलसाठा हा मृत अवस्थेत असून हे पाच प्रकल्प कोरड्या अवस्थेत आहेत़ उर्वरित प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा असल्याने मे अखेर या प्रकल्पाची काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़

नांदेड : किनवट तालुक्यातील २१ पैकी पाच प्रकल्पांतील जलसाठा हा मृत अवस्थेत असून हे पाच प्रकल्प कोरड्या अवस्थेत आहेत़ उर्वरित प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा असल्याने मे अखेर या प्रकल्पाची काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़

आजघडीला असलेला प्रकल्पातील जलसाठा याप्रमाणे- नागझरी-५७़५८, लोणी-२३़३३, डोंगरगाव-८१़७३, मुळझरा-१३़५८, थारा-८९़९३, जलधरा-८४़४८, हुडी-२०़७५, पिंपळगाव (कि़)-१७़२१, सिंदगी (बोधडी)-७४़००, लक्कडकोट-१०़५६, निराळा-२४़२० टक्केच असल्याने ऐन उन्हाळ्यात प्रकल्पाखालील गावांत पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे़ 

प्रकल्पाची ही परिस्थिती पाहता तलावातील गाळ  काढण्याचा  उपक्रम प्रशासनाने शेतकर्‍यांवर कोणताही बोजा न टाकता हाती घ्यावा़ गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना  प्रभावीपणे राबवावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत़ गाळात रुतलेले प्रकल्प गाळमुक्त झाल्यास पाणीसाठा वाढून तसेच गाळ शेतात पडल्यास शेतकरी सुजलाम्-सुफलाम् होण्यास मदत होईल, नव्हे उत्पन्नात वाढ होईल. 

किनवट तालुक्यात नागझरी, लोणी, डोंगरगाव मध्यम प्रकल्प आहेत़  उर्वरित १८ प्रकल्प हे लघू व बृहत आहेत़ १ हजार २४० मि़मी़ इतकी वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी असलेल्या तालुक्यात केवळ ४६ टक्केच्या आतच पाऊस पडल्याने व तोही कधी भीज तर कधी रिमझीम़ मोठा पाऊस पडलाच नसल्याने प्रकल्प भरलेच नाहीत़ जे भरले त्यात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने जानेवारीत अंबाडी-नंदगाव, वरसांगवी, सिरपूर, मांडवी हे पाच प्रकल्प कोरड्या स्थितीत म्हणजे मृतसाठा असलेली आहेत़ निचपूर-०़७२, कुपटी-२़८५, सिंदगी-५़८३, पिंपळगाव मि़-२़२५ व सावरगाव २़४८ अशा एक अंकीच टक्के जलसाठा असल्याने तीही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत़

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड