शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेतू सुविधा केंद्र ‘हाऊसफुल्ल’

By admin | Updated: June 27, 2014 00:11 IST

जालना : महाविद्यालयीन प्रवेशाकरीता लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू सुविधा केंद्रात पालकांसह विद्यार्थ्यांची दररोज गर्दी होत आहे.

जालना : महाविद्यालयीन प्रवेशाकरीता लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू सुविधा केंद्रात पालकांसह विद्यार्थ्यांची दररोज गर्दी होत आहे. मात्र केंद्रात एकच नायब तहसीलदार असल्याने त्यांच्यावर सर्व ताण पडत आहे. अन्य एक नायब तहसीलदार व अव्वल कारकून येथे येतच नसल्याचे समजते. सध्या सर्वत्र महाविद्यालयीन प्रवेशाची घाई सुरू आहे. त्यासाठी विविध प्रमाणपत्रांची गरज असल्याने ही प्रमाणपत्रे सेतू सुविधा कार्यालयातून मिळवावी लागतात. जातीचे प्रमाणपत्र हे उपविभागीय कार्यालयातून प्रमाणित करून सेतू द्वारे मिळते. जालना शहराबरोबरच तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या विविध कामांसाठी सेतू सुविधा केंद्रात येतात. त्यासाठी दररोज केंद्रात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. एवढेच नव्हे, तर खिडकीतूनही काहीजण फॉर्म खरेदी करत आहेत. मात्र ही प्रमाणपत्रे विलंबाने मिळत असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. केंद्रात दोन नायब तहसीलदार आणि एक अव्वल कारकून अशा तीन जणांची नियुक्ती आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्रात एकच नायब तहसीलदार हजर असतात, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय तहसील कार्यालयात प्रमाणपत्रांच्या कामासाठी जे मंडळ अधिकारी नियुक्त आहेत, तेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अशी माहिती हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेतू सुविधा केंद्रात कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आहे. मात्र केंद्रात नियुक्त अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. (प्रतिनिधी)गर्दीमुळे खिडकीतूनही होतेय फॉर्मची विक्रीगुरूवारी सेतू सुविधा केंद्रात पाय ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे काही जणांनी खिडकीतूनच फॉर्मची खरेदी केली. या केंद्रात पुरेशा अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने एकट्या अधिकाऱ्यावरच ताण पडत असल्याचे चित्र दिसून आले. विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी जून, जुलै या काळातच अधिक गर्दी होते. मात्र या कालावधीत प्रशासनाकडून सेतू सुविधा केंद्रासाठी आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक होणेही गरजेचे असल्याचे मत काही जणांनी व्यक्त केले.