शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लॉकडाऊनने कालविले वैवाहिक जीवनात विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या ...

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडावे लागले आहे. त्यातही दुसऱ्या लाटेमुळे तर सर्वांना हैराण करून सोडले आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून घराघरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर संसार तुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेलमध्ये लॉकडाऊनच्या काळात येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. प्रत्येक प्रकरणातील कारणे अफलातून आहेत. तक्रार घेऊन आलेल्या जोडप्यांचे या ठिकाणी योग्य समुपदेशन केले गेले. त्यांच्या कुटुंबियांनाही बोलाविण्यात आले होते. भरोसा सेलच्या या प्रयत्नामुळे जवळपास १९५ हून अधिक जणांचे तुटत आलेले संसार पुन्हा जुळले आहेत,

तर ज्या विषयात पती आणि पत्नीत तडजोड झाली नाही अशावेळी त्यांना कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडल्याने एकमेकांच्या सवयीबद्दलच्या कुरबुरी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरात चिडचिड करणे, किरकोळ कारणावरून वाद घालणे, मारहाण करणे, असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कोरोनापूर्वीपेक्षा आता कोरोनाच्या काळात भरोसा सेलमधील तक्रारींचा ओघ वाढला आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या विरोधात केलेल्या तक्रारींची संख्याही अधिक आहे, हे विशेष. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा कायम राहावा यासाठी त्यांना योग्य समुपदेशन करण्याची गरज आहे.

१९५ पती-पत्नीचे भांडण सोडविले

मार्च २०२० पासून २०२१ पर्यंत भरोसा सेलमध्ये एकूण ६५० तक्रारी आल्या होत्या. त्यातील १५५ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे,

तर जानेवारी २०२१ पासून मे महिन्यापर्यंत ३३३ तक्रारी आल्या होत्या, त्यातील ४० प्रकरणांत समेट घडवून आणण्यात आला आहे.

भरोसा सेलमधील समुपदेशक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून तुटणारा संसार जोडण्यासाठी प्रयत्न करतात.