शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

दुसऱ्या लॉकडाऊनने कालविले वैवाहिक जीवनात विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या ...

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडावे लागले आहे. त्यातही दुसऱ्या लाटेमुळे तर सर्वांना हैराण करून सोडले आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून घराघरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर संसार तुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेलमध्ये लॉकडाऊनच्या काळात येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. प्रत्येक प्रकरणातील कारणे अफलातून आहेत. तक्रार घेऊन आलेल्या जोडप्यांचे या ठिकाणी योग्य समुपदेशन केले गेले. त्यांच्या कुटुंबियांनाही बोलाविण्यात आले होते. भरोसा सेलच्या या प्रयत्नामुळे जवळपास १९५ हून अधिक जणांचे तुटत आलेले संसार पुन्हा जुळले आहेत,

तर ज्या विषयात पती आणि पत्नीत तडजोड झाली नाही अशावेळी त्यांना कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडल्याने एकमेकांच्या सवयीबद्दलच्या कुरबुरी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरात चिडचिड करणे, किरकोळ कारणावरून वाद घालणे, मारहाण करणे, असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कोरोनापूर्वीपेक्षा आता कोरोनाच्या काळात भरोसा सेलमधील तक्रारींचा ओघ वाढला आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या विरोधात केलेल्या तक्रारींची संख्याही अधिक आहे, हे विशेष. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा कायम राहावा यासाठी त्यांना योग्य समुपदेशन करण्याची गरज आहे.

१९५ पती-पत्नीचे भांडण सोडविले

मार्च २०२० पासून २०२१ पर्यंत भरोसा सेलमध्ये एकूण ६५० तक्रारी आल्या होत्या. त्यातील १५५ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे,

तर जानेवारी २०२१ पासून मे महिन्यापर्यंत ३३३ तक्रारी आल्या होत्या, त्यातील ४० प्रकरणांत समेट घडवून आणण्यात आला आहे.

भरोसा सेलमधील समुपदेशक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून तुटणारा संसार जोडण्यासाठी प्रयत्न करतात.