शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

संत रविदास तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:23 IST

नांदेड: संत गुरू रविदास महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण ...

नांदेड: संत गुरू रविदास महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शेवटपर्यंत परिश्रम घेतले, असे प्रतिपादन भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अनंत राऊत यांनी केले.

नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील गुरू रविदास महाराज मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरू रविदासजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत रविदास महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्यंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु रविदासजी महाराज मंदिरात पार पाडण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. अनंत राऊत बोलत होते. याप्रसंगी गुरू रविदासजी मंदिराचे अध्यक्ष ब्रम्हाजी गायकवाड, कांशी-माया प्रबोधन मंचचे अध्यक्ष तुकाराम टोम्पे तथा सचिव इंजि. पदमाकर बाबरे, अ. भा. र. धर्म संघटनेचे माणिक अन्नपूर्णे, शिवानंद जोगदंड, रा. च. म.चे राज्य कार्यकारिणी सदस्य अस्तिक कोरडे,रा.च.म.चे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड व जिल्हाध्यक्ष माधवराव निंबाळकर यांच्यासह अ. भा. गु. र. धर्म संघटनेचे प्रा. नागनाथ गिरगावकर, गोविंदराव माऊली पार्डीकर, विठ्ठलराव वाघमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास टोम्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.अनंत राऊत पुढे बोलताना म्हणाले, संत रविदास महाराजांनी जातीभेद नष्ट करून समता प्रस्थापित करण्याकरिता अविरतपणे प्रयत्न केले. त्याचवेळी, गुरू रविदासांनी देशभर भ्रमंती करून समस्त बहुजनांना एकत्रीत आणण्याचा प्रयत्न केला असल्याचेही नमूद करून बौद्ध धम्म हा विश्वातील सर्वश्रेष्ठ मानवतावादी तथा विज्ञानवादी धर्म असल्याचे आवर्जून सांगितले. जयंतीमहोत्सवादरम्यान, गुरु रविदास महाराजांच्या विचाराचे प्रचारक रविश्री रविदासिया गोपीनाथजी गाडे महाराज निंबोडीकर व आनंदजी पवार महाराज चितळीकर यांनी संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांचे जीवन व कार्य या विषयावर समाजबांधवांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक तुकाराम टोम्पे यांनी केले. सूत्रसंचालन पदमाकर बाबरे यांनी, तर चांदोजी सोनटक्के यांनी आभार मानले. व्यंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर रविदास मंदिरातील महाप्रसादाच्या कार्यक्रमाने प्रस्तुत जयंतीमहोत्सवाची सांगता झाली. जयंतीमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ब्रम्हाजीराव गायकवाड, शंकर पेटकर, संभाजी घडलिंगे, रानबाजी वानखेडे, श्रीराम गोरे, व्यंकटराव सोनटक्के, व्यंकटराव दुधंबे, चांदोजी सोनटक्के आणि त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच जयंती मंडळाच्या