शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

संत रविदास तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:23 IST

नांदेड: संत गुरू रविदास महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण ...

नांदेड: संत गुरू रविदास महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शेवटपर्यंत परिश्रम घेतले, असे प्रतिपादन भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अनंत राऊत यांनी केले.

नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील गुरू रविदास महाराज मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरू रविदासजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत रविदास महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्यंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु रविदासजी महाराज मंदिरात पार पाडण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. अनंत राऊत बोलत होते. याप्रसंगी गुरू रविदासजी मंदिराचे अध्यक्ष ब्रम्हाजी गायकवाड, कांशी-माया प्रबोधन मंचचे अध्यक्ष तुकाराम टोम्पे तथा सचिव इंजि. पदमाकर बाबरे, अ. भा. र. धर्म संघटनेचे माणिक अन्नपूर्णे, शिवानंद जोगदंड, रा. च. म.चे राज्य कार्यकारिणी सदस्य अस्तिक कोरडे,रा.च.म.चे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड व जिल्हाध्यक्ष माधवराव निंबाळकर यांच्यासह अ. भा. गु. र. धर्म संघटनेचे प्रा. नागनाथ गिरगावकर, गोविंदराव माऊली पार्डीकर, विठ्ठलराव वाघमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास टोम्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.अनंत राऊत पुढे बोलताना म्हणाले, संत रविदास महाराजांनी जातीभेद नष्ट करून समता प्रस्थापित करण्याकरिता अविरतपणे प्रयत्न केले. त्याचवेळी, गुरू रविदासांनी देशभर भ्रमंती करून समस्त बहुजनांना एकत्रीत आणण्याचा प्रयत्न केला असल्याचेही नमूद करून बौद्ध धम्म हा विश्वातील सर्वश्रेष्ठ मानवतावादी तथा विज्ञानवादी धर्म असल्याचे आवर्जून सांगितले. जयंतीमहोत्सवादरम्यान, गुरु रविदास महाराजांच्या विचाराचे प्रचारक रविश्री रविदासिया गोपीनाथजी गाडे महाराज निंबोडीकर व आनंदजी पवार महाराज चितळीकर यांनी संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांचे जीवन व कार्य या विषयावर समाजबांधवांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक तुकाराम टोम्पे यांनी केले. सूत्रसंचालन पदमाकर बाबरे यांनी, तर चांदोजी सोनटक्के यांनी आभार मानले. व्यंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर रविदास मंदिरातील महाप्रसादाच्या कार्यक्रमाने प्रस्तुत जयंतीमहोत्सवाची सांगता झाली. जयंतीमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ब्रम्हाजीराव गायकवाड, शंकर पेटकर, संभाजी घडलिंगे, रानबाजी वानखेडे, श्रीराम गोरे, व्यंकटराव सोनटक्के, व्यंकटराव दुधंबे, चांदोजी सोनटक्के आणि त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच जयंती मंडळाच्या