शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नांदेड जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रिया कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:37 IST

जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावादरम्यान पर्यावरणविषयक आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे जिल्ह्यात वाळू घाट लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा फटका बसणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावादरम्यान पर्यावरणविषयक आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे जिल्ह्यात वाळू घाट लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा फटका बसणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नागपूर खंडपीठाने वाळू घाट लिलावासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर निर्णय देताना पर्यावरण आघात मूल्यांकन व पर्यावरणीय व्यवस्थापन योजना याशिवाय वाळू लिलावाची सुरू असलेल्या प्रक्रियेस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांत वाळू लिलाव प्रक्रिया थांबवावी लागली आहे.नांदेड जिल्ह्यात मात्र वाळू घाटांच्या लिलावापूर्वी पर्यावरण विषयक आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली. केंद्र सरकारने २०१६ मध्ये निश्चित केलेल्या पर्यावरणविषयक धोरणानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हास्तरीय पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली आहे.या समितीच्या बैठका घेतल्या जातात. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ही पर्यावरण विभागाकडून आलेल्या मान्यतेनंतरच केली आहे. ज्या वाळू घाटाची परवानगी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाली नाही त्या घाटाचा लिलावही पर्यावरण विभागाच्या निर्णयास अधीन राहून करण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९ घाटांचे लिलाव झाले आहेत.या घाटांच्या लिलावातून १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून कंत्राटदाराकडून बोलीची रक्कमही भरुन घेतली जात आहे. दुसºया टप्यातही ५७ वाळू घाटांची ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर नांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया थांबते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र जिल्ह्यात पर्यावरणविषयक बाबींचे पालन केले जात असल्याचे सांगून परिणामी जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी स्पष्ट केले़