शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

नांदेड जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रिया कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:37 IST

जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावादरम्यान पर्यावरणविषयक आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे जिल्ह्यात वाळू घाट लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा फटका बसणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावादरम्यान पर्यावरणविषयक आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे जिल्ह्यात वाळू घाट लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा फटका बसणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नागपूर खंडपीठाने वाळू घाट लिलावासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर निर्णय देताना पर्यावरण आघात मूल्यांकन व पर्यावरणीय व्यवस्थापन योजना याशिवाय वाळू लिलावाची सुरू असलेल्या प्रक्रियेस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांत वाळू लिलाव प्रक्रिया थांबवावी लागली आहे.नांदेड जिल्ह्यात मात्र वाळू घाटांच्या लिलावापूर्वी पर्यावरण विषयक आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली. केंद्र सरकारने २०१६ मध्ये निश्चित केलेल्या पर्यावरणविषयक धोरणानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हास्तरीय पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली आहे.या समितीच्या बैठका घेतल्या जातात. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ही पर्यावरण विभागाकडून आलेल्या मान्यतेनंतरच केली आहे. ज्या वाळू घाटाची परवानगी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाली नाही त्या घाटाचा लिलावही पर्यावरण विभागाच्या निर्णयास अधीन राहून करण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९ घाटांचे लिलाव झाले आहेत.या घाटांच्या लिलावातून १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून कंत्राटदाराकडून बोलीची रक्कमही भरुन घेतली जात आहे. दुसºया टप्यातही ५७ वाळू घाटांची ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर नांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया थांबते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र जिल्ह्यात पर्यावरणविषयक बाबींचे पालन केले जात असल्याचे सांगून परिणामी जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी स्पष्ट केले़