शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेची लूट; २० कि.मी.वरील पूर्णा प्रवासासाठी १०० कि.मी.चे भाडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST

नांदेड विभागातून देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. अनलाॅक प्रक्रियेमध्ये तब्बल ७८ गाड्या सुरू करण्यात आल्या असून यातील ...

नांदेड विभागातून देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. अनलाॅक प्रक्रियेमध्ये तब्बल ७८ गाड्या सुरू करण्यात आल्या असून यातील साठहून अधिक गाड्यांना विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येत आहे. रेग्युलर धावणाऱ्या रेल्वेपेक्षा या गाड्यांना अधिक असणाऱ्या तिकिटाचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

तिकिटात दुप्पटच फरक

कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या; परंतु कालांतराने विशेष गाड्या सुरू होत आहेत.

रेग्युलर धावणाऱ्या रेल्वे आणि उत्सव विशेष व विशेष गाड्यांच्या तिकिटात दुपटीचा फरक येत आहे.

प्रवाशांकडून विशेष रेल्वेच्या नावावर सुरू असलेली लूट तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अरुण मेघराज यांनी केली.

लॉकडाऊनपासून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वे सुरू केल्या. त्यात आता वाढ झाली असून नांदेडातून ७८ गाड्या धावत आहेत.

यातील बहुतांश गाड्यांना तिकिटासाठी किमान १०० आणि कमाल ३०० चा फाॅर्म्युला वापरला जात आहे. त्यामुळे २० किमीसाठी १०० रुपयांचे तिकीट लागते.

कोरोनामुळे विविध नियम घालून दिले आहेत. त्यात रुग्णसंख्या घटूनही नियम शिथिल करण्यात आले नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्वच रेल्वे गाड्या सुरू करून पूर्वीप्रमाणेच तिकीट आकारावे. कोरोनाच्या नावाखाली प्रवाशांची लूट असून ती थांबविण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत. - गणेश पाटील

विशेष रेल्वेच्या नावाखाली केवळ पैसे उकळण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. आजघडीला सर्वकाही सुरळीत सुरू असताना रेल्वेच का सुरू नाहीत. सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवावर रेल्वेची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे रेल्वेने अशाप्रकारे प्रवाशांची होणारी लूट थांबवून सर्व गाड्या सुरू कराव्यात. - सोनू कांबळे

ही लूट कधी बंद होणार?

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रेल्वेसेवा बंद होती; परंतु, परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी मजूर रेल्वे सोडण्यात आल्या. त्यानंतर विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. आजघडीला कोणतेही सण उत्सव नसताना विशेष रेल्वे का चालविल्या जात आहेत. सर्व रेल्वे नियमितपणे सुरू होऊन प्रवाशांची होणारी आर्थिक लूट कधी थांबणार आहे, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.

आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे

०४६९२ अमृतसर - नांदेड

०४६९१ नांदेड - अमृतसर

०२४४० श्री गंगासागर- नांदेड

०२४३९ नांदेड - श्री गंगासागर

०७६१४ नांदेड - पनवेल

०७६१३ पनवेल - नांदेड

०२२७२ मुंबई - जालना