शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात वधू-वरांना दिलासा; वीस वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:28 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेंव्हापासून नियोजित विवाह सोहळे पार पाडायचे कसे? याची चिंता वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबियांनाही होती.

ठळक मुद्देनांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  सोहळ्याची माहिती पोलीस ठाण्याला लागणार द्यावी

नांदेड : लॉकडाऊनच्या कालावधीत विवाह सोहळे अडचणीत आले होते. मात्र आता पोलीस ठाणे आणि लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती देवून तसेच कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचे पालन करुन विवाह सोहळा उरकता येणार आहे. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेंव्हापासून नियोजित विवाह सोहळे पार पाडायचे कसे? याची चिंता वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबियांनाही होती. लॉकडाऊनकाळात संचारबंदीचे आदेश असल्याने पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित आल्यास गुन्हा दाखल केला जात असल्याने अनेकांनी हे सोहळे पुढे ढकलले होते. तर काहींनी मोबाईलवर आॅनलाईन सोहळे पार पाडले. मात्र विवाह सोहळ्यासाठीची प्रमाणित कार्यप्रणाली प्रशासनाने जारी केल्याने हे सोहळे पार पडण्यास मदत मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश जारी केले. या आदेशानुसार लग्नसोहळ्याला आता जास्तीत जास्त २० व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. लग्नाच्या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक आहे. तसेच या सर्वांना फिजीकल डिस्टन्सींगचेही पालन करावे लागणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हॅन्डवॉश आणि सॅनीटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले असून लग्नाचा विधी संपल्यानंतर सदर ठिकाणाबरोबरच लग्नातील विविध वस्तूंचे निर्जतूकीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत वर अथवा वधूच्या निवासस्थानी किंवा नातेवाईकांच्या खाजगी जागेतच या लग्नसमारंभास परवानगी देण्यात येणार आहे. या समारंभाच्या अनुषंगाने लग्नाचा दिनांक, स्थळ, वेळ आदीबाबतची पूर्ण माहिती संबंधितांनी लगतच्या पोलीस स्टेशन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेला देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.प्रशासनाने घालून दिलेल्या या नियमांचे उल्लंघन झाल्यास मात्र संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड