शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नायगाव ग्रा़ पं ची जमीन हस्तांतरण प्रकरणातील सहभागीविरूद्ध गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:26 IST

आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती.

औरंगाबाद : आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती.या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश पाटील यांनी दिले आहेत. सदर जमिनीच्या हस्तांतरणाकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यासंदर्भातील मूळ रेकॉर्ड २७ मार्च २०१९ रोजी खंडपीठात सादर करण्याचा आदेश खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणी वेळी नांदेड जिल्हा परिषदेला दिला होता.आ. वसंतराव चव्हाण सरपंच असताना त्यांनी नांदेड-हैदराबाद महामार्गावरील ग्रामपंचायतीच्या मालकीचा जुना गट क्रमांक ४३९ व सर्व्हे क्रमांक १२६ या २ हेक्टर ४१ आरमध्ये भूखंड पाडून निवासी आणि व्यावसायिक उद्देशासाठी ३३ वर्षांच्या कराराने वार्षिक २०० रुपये भाडेतत्त्वावर स्वत:च्या अधिकारात संबंधितांच्या नावे हस्तांतरित केले होते, असे करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ५५ आणि ५६ नुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांची परवानगी अनिवार्य असताना विनापरवानगी विक्री केल्याने त्याविरोधात नायगाव बाजार येथील रघुनाथ तुकाराम सोनकांबळे यांनी अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे.सोनकांबळे यांनी १३ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलिसांत तक्रार दिली. विशेष पोलीस महानिरीक्षकांना २१ फेब्रुवारीला निवेदन दिले; परंतु त्यावर कारवाई झाली नाही, म्हणून त्यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे.या प्रकरणात अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांना अ‍ॅड. राहुल गारुळे सहकार्य करीत आहेत. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, आ. चव्हाण यांच्यातर्फे अ‍ॅड. विलास सावंत आणि नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. अनिल एम. गायकवाड काम पाहत आहेत.३३ वर्षांचा करारआ. वसंतराव चव्हाण सरपंच असताना त्यांनी नांदेड-हैदराबाद महामार्गावरील ग्रामपंचायतीच्या मालकीचा जुना गट क्रमांक ४३९ व सर्व्हे क्रमांक १२६ या २ हेक्टर ४१ आरमध्ये भूखंड पाडून निवासी आणि व्यावसायिक उद्देशासाठी ३३ वर्षांच्या कराराने वार्षिक २०० रुपये भाडेतत्त्वावर स्वत:च्या अधिकारात संबंधितांच्या नावे हस्तांतरित केले होते, असे करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांची परवानगी घेतली नाही.

टॅग्स :NandedनांदेडAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठgram panchayatग्राम पंचायत