शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रानडुकराचा महिलेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:45 IST

तळ्याच्या काठावर असलेल्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवून जखमी केले. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात घडली़ जखमी महिलेवर साने गुरुजी रुग्णालयात डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उपचार केले़

ठळक मुद्देनिचपूरची घटना : आरडाओरड केल्यामुळे वाचला जीव

किनवट : तळ्याच्या काठावर असलेल्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवून जखमी केले. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात घडली़ जखमी महिलेवर साने गुरुजी रुग्णालयात डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उपचार केले़निचपूर ता़ किनवट येथील यशवंत केंद्रे यांचे तळ्याच्या काठावर शेत आहे़ शेतात कापूस पीक आहे़ कापसाची मजुरीने वेचणी करणाऱ्या अलकाबाई रामेश्वर नागरगोजे या महिलेवर रानडुक्कराने अचानक हल्ला केला़ या हल्ल्यात अलकाबाई नागरगोजे या जखमी झाल्या़ शेतात असलेल्या एका महिलेने व एका मुलाने आरडाओरडा करून डुक्करला हुसकावून लावले व जखमी अलकाबाईची डुकराच्या तावडीतून सुटका केली़घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल के़एनख़ंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साने गुरुजी रुग्णालयात धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी पाच हजार रुपयांची मदत केली़ घटनेचा पंचनामा करणे सुरू आहे़ डॉ़ अशोक बेलखोडे यांनी जखमी महिलेवर उपचार केले़ प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले़जंगलात पाण्याची सोय नसल्याने वन्यप्राणी मानव वस्तीकडे येऊ लागले आहेत़ त्यातूनच मानवावर हल्ले होत आहेत़ तसेच याचा फायदा घेऊन शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याच्या घटनाही घडत आहेत. वनविभागाने जंगलात पाणवठे निर्माण करण्याची मागणी होत आहे़ पाणवठयाबाबत वनक्षेत्रपाल के़एनख़ंदारे यांना विचारले असता जंगलात नैसर्गिक पाणवठे असून वनविभागाने पाणवठे निर्माण केले नसल्याचे सांगत निचपूर भागात मोठा तलाव आहे़

टॅग्स :Nandedनांदेडforestजंगल