शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अक्षरनाती जोडण्याचे काम प्रकाशकांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:13 IST

मुद्रण, प्रकाशन आणि लेखन या तिन्ही बाबी जपत निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी मांडलेला ‘अक्षरनाती’ हा आत्मकथनपर ग्रंथ म्हणजे प्रत्येक प्रकाशकाच्या जीवनाचा संघर्षप्रवास होय, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम प्रकाशक बाबा भांड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे प्रतिपादन

नांदेड : प्रकाशनक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक प्रकाशकांना जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष प्रकाशकाच्या कौटुंबिक जीवनापर्यंत पोहोचतो. मुद्रण, प्रकाशन आणि लेखन या तिन्ही बाबी जपत निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी मांडलेला ‘अक्षरनाती’ हा आत्मकथनपर ग्रंथ म्हणजे प्रत्येक प्रकाशकाच्या जीवनाचा संघर्षप्रवास होय, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम प्रकाशक बाबा भांड यांनी व्यक्त केले.प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या ‘अक्षरनाती’ या आत्मकथनाचे बाबा भांड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील तर अ़ भा़ मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, प्रा.श्यामल पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती़मराठवाड्यातील पहिला प्रकाशक म्हणून सुरू झालेला प्रवास मराठवाड्याच्या साहित्यभूमीला समृद्ध करणारा ठरला. चारशे ग्रंथांची निर्मिती करीत तितक्याच लेखकांना सांभाळण्याचे काम केल्याचे बाबा भांड यांनी सांगितले़प्रा. श्यामल पत्की म्हणाल्या, निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी अक्षरनाती या गं्रथाच्या माध्यमातून जीवनाची प्रतिमा आणि जगण्याचे भान व्यक्त केले़ प्रा.दत्ता भगत म्हणाले, सूर्यवंशी यांनी जे आवडलं, जे जपलं, जे भोगलं तेच त्यांनी ‘अक्षरनाती’तून व्यक्त केलं आहे. प्रारंभी निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी आपला ४८ वर्षांचा प्रवास कथन केला़ सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ आणि निर्मलकुमार यांचे सुपुत्र अमोल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले तर प्रा. दिगंबर सूर्यवंशी यांनी आभार मानले.

‘अंतर्मनाला डोळे फोडण्याचे काम साहित्य करते’समाजाचं आपण काही देणं लागतो, याची जाणीव ठेवून साहित्यनिर्मिती केली पाहिजे, कारण अंतर्मनाला डोळे फोडण्याचे काम साहित्य करीत असते, असे मत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Nandedनांदेडliteratureसाहित्य