शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सुविधा द्या अन्यथा तेलंगणात जाऊ; नांदेडमधील सहा तालुक्यांची आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 12:46 IST

१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुक्यांना तेलंगणाची सीमा हद्द जोडून आहे.

नांदेड : राज्याच्या सीमावर्ती भागात मागास जीवन जगत असलेल्या नागरिकांनी सुविधा देण्याची ओरड करूनही महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांची कृती समितीही स्थापन करण्यात आली असून, हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.

१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुक्यांना तेलंगणाची सीमा हद्द जोडून आहे. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या तालुक्यात असून, येथील नागरिक मागास जीवन जगत आहेत. तेलंगणातील नागरिकांना सर्व सुविधा मिळतात. तेथील सरकार मजूर, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोफत वीज, पाणी, बियाणे, शेती औजारे मिळतात. कृषी पंप, विहिरींच्या योजना आहेत. शिवाय मोफत शिक्षण मिळते. तेथील सरकार गरिबांच्या मदतीला धावते, दीनबंधू योजना, व्यवसायासाठी आर्थिक मदत, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, भूमिहिनांना चार जमीन मिळते, या सुविधा तेलंगणात मिळतात. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र या सुविधांसाठी झगडावे लागते. त्यामुळे या तालुक्यातील सीमाहद्दीवर असलेल्या गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.दरम्यान, सीमाहद्दीवर असलेल्या नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे’ही कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात महाराष्ट्र-कनार्टक प्रश्न पेटला असताना दुसरीकडे तेलंगणात जाण्याच्या मागणीवरून हा प्रश्नही चिघळण्याची शक्यता आहे.

सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मिळणाऱ्या सुविधा आणि तेलंगणात मिळणाऱ्या सुविधा याची तुलना करणे यात गैर काहीच नाही. या नागरिकांचे प्रश्न आम्ही २०१८ पासून शासनाकडे मांडत आहोत. मात्र, शासनाने लक्ष दिले नाही. आतापर्यंत चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. या प्रश्नावर समन्वयक समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडे मांडणार आहोत, असे सीमावर्ती प्रश्न समन्वय समितीचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाNandedनांदेड