शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

सुविधा द्या अन्यथा तेलंगणात जाऊ; नांदेडमधील सहा तालुक्यांची आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 12:46 IST

१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुक्यांना तेलंगणाची सीमा हद्द जोडून आहे.

नांदेड : राज्याच्या सीमावर्ती भागात मागास जीवन जगत असलेल्या नागरिकांनी सुविधा देण्याची ओरड करूनही महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांची कृती समितीही स्थापन करण्यात आली असून, हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.

१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुक्यांना तेलंगणाची सीमा हद्द जोडून आहे. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या तालुक्यात असून, येथील नागरिक मागास जीवन जगत आहेत. तेलंगणातील नागरिकांना सर्व सुविधा मिळतात. तेथील सरकार मजूर, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोफत वीज, पाणी, बियाणे, शेती औजारे मिळतात. कृषी पंप, विहिरींच्या योजना आहेत. शिवाय मोफत शिक्षण मिळते. तेथील सरकार गरिबांच्या मदतीला धावते, दीनबंधू योजना, व्यवसायासाठी आर्थिक मदत, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, भूमिहिनांना चार जमीन मिळते, या सुविधा तेलंगणात मिळतात. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र या सुविधांसाठी झगडावे लागते. त्यामुळे या तालुक्यातील सीमाहद्दीवर असलेल्या गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.दरम्यान, सीमाहद्दीवर असलेल्या नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे’ही कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात महाराष्ट्र-कनार्टक प्रश्न पेटला असताना दुसरीकडे तेलंगणात जाण्याच्या मागणीवरून हा प्रश्नही चिघळण्याची शक्यता आहे.

सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मिळणाऱ्या सुविधा आणि तेलंगणात मिळणाऱ्या सुविधा याची तुलना करणे यात गैर काहीच नाही. या नागरिकांचे प्रश्न आम्ही २०१८ पासून शासनाकडे मांडत आहोत. मात्र, शासनाने लक्ष दिले नाही. आतापर्यंत चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. या प्रश्नावर समन्वयक समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडे मांडणार आहोत, असे सीमावर्ती प्रश्न समन्वय समितीचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाNandedनांदेड