शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

कॅन्सरमुक्तीचा संकल्प, तलाठी सज्जाच्या निर्मितीने कामांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:45 IST

ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे.

नांदेड : जिल्ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे.जिल्ह्यात कॅन्सरमुक्तीसाठी प्रशासनाने नवी सुरूवात केली आहे. उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर तज्ज्ञांच्या मदतीने होत असलेल्या कॅन्सर शिबिरात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. या रुग्णांची तपासणी केल्यानंतर वेळेवर कॅन्सरचे निदान झाल्यानंतर उपचाराचा मोकळा होत आहे. कॅन्सर या रोगात निदान उशिरा झाल्याने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.जिल्ह्यात यंदा ८० टक्के पाऊस झाला असला तरीही देगलूर, मुखेड, उमरी या तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्याचवेळी लोहा, नायगाव, कंधार या तालुक्यांत पाणीटंचाईचे मोठे सावट उद्भवले आहे. परतीचा पाऊस जिल्ह्यात यंदा झालाच नसल्याने रबीची पेरणीही कमी प्रमाणात झाली आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामही सुरू असले तरी या योजनेसाठी मिळणारा लोकसहभाग मात्र अत्यल्पच आहे. त्यामुळे ही योजना प्रशासकीयच ठरली आहे.मावळत्या वर्षात सर्वाधिक चिंता महसूल विभागाला कृष्णूर येथील मेगा धान्य घोटाळ्याने सतावली. या प्रकरणाने महसूल विभागाची मोठी नाचक्की झाली. हे प्रकरण अद्यापही चौकशीवरच आहे.पुरवठा विभागाने केलेल्या आॅनलाईन प्रणालीच्या वापराची नोंद देशभरात घेण्यात आली आहे. जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणूनही केंद्र पातळीवर निवड झाली आहे. आॅनलाईन प्रणालीद्वारे धान्य वाटप तसेच डाटा संगणकीकरणाचे प्रमाणही चांगले राहिले आहे.प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांसाठी उभारी योजनेअंतर्गत नव्या योजना सुरू केल्या आहेत. प्रशासनाने मावळत्या वर्षात थेट आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या दारी जावून शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळाला की नाही? याची माहिती घेतली. पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जून-जुलैपासूनच कामाला लागले आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम, व्हीव्हीपॅट प्रशिक्षण यासह निवडणूक ओळखपत्रांच्या अद्ययावतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. यामध्ये रिक्त पदांची चिंता कायमच राहिली.पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाची स्थानिक सत्ताधारी आणि पालकमंत्री यांच्यात मोठी गोची झाली आहे. याचे मोठे उदाहरण महापालिकेचा दलित वस्ती निधी मंजुरी प्रकरण आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आहेत. या बैठकामध्ये प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. इतकेच नव्हे, स्थानिक अधिकाºयांनी मनपाच्या दलित वस्ती योजनेच्या कामाची चौकशी करुन अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल असमाधानकारक असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी मंत्रालयस्तरावर या कामाची चौकशी लावली आहे. त्यातच जिल्हा परिषद पदाधिकाºयांनीही पालकमंत्र्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. यात कोंडी मात्र प्रशासनाचीच होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNanded zpनांदेड जिल्हा परिषदNanded policeनांदेड पोलीस