शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

टाकावू वस्तूंपासून हळदीसाठी फायदेशीर यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 12:09 IST

ग्रासरुटइनोव्हेटर : सुनील कौसल्ये यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने शेती करून शेती ही नुकसानीची नव्हे, तर फायद्याचीच असल्याचे त्यांंनी दाखवून दिले.

- गोविंद शिंदे (बारूळ जि.नांदेड)

आजघडीला तरुण शेतकरीशेतीकडे वळत असल्याचे चित्र आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. ज्यांनी यात यश मिळविले, असे आज आनंदी आहेत. राहाटी, ता. कंधार येथील सुनील कौसल्ये यांचा मूळ व्यवसाय शेतीचा. ते वेल्डिंग मेकॅनिकलचाही व्यवसाय करतात. कौसल्ये यांनी शेतीत वेगवेगळे उपक्रम राबविले. यंत्र बनविले. हळदीला माती लावण्यासाठी टाकावू वस्तूंपासून टिकाऊ यंत्र बनवून त्यांनी अफलातून यंत्र बनविले. त्यांचा हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे.

सुनील कौसल्ये यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने शेती करून शेती ही नुकसानीची नव्हे, तर फायद्याचीच असल्याचे त्यांंनी दाखवून दिले. कौसल्ये हे दरवर्षी हळदीचे पीक घेतात. हळदीला दोन्ही सरीत माती लावण्यासाठी दरवर्षी एकरी ४ हजार रुपये मजुरी त्यांना द्यावी लागते. तीन एकरासाठी केवळ मजुरीवर त्यांना १२ हजार रुपये मोजावे लागत होते. एवढे करूनही मजूर मिळतील याची खात्री नाही. एकीकडे पैसे मोजा आणि दुसरीकडे मजुरांचे चोचले. यामुळे ते त्रस्त झाले होते. मजुराशिवाय काही करता येईल? हा विचार त्यांचा मनात घोळत होता.

कौसल्ये हे शेतकरी असले तरीही ते मेकॅनिकचा व्यवसायही करीत असल्याने त्यांनी दुकानातीलच भंगारातील जास्त जाडीचे पत्रे जमा करून त्याला त्रिकोणाचा आकार दिला. दोन पत्र्यांत एक फुटाचे अंतर ठेवले. एका पत्र्याची लांबी १६ इंची, तर रुंदी ४ इंची ठेवून समोर त्याला पाईप जोडून यंत्र तयार केले. यंत्र नागरासारखे झाले. यंत्राचा उपयोग केला. तो फायदेशीर ठरला. यामुळे वेळ, मनुष्यबळ, खर्चावर मात झाली. पिकांचे नुकसान टळले. कौसल्ये यांना १० एकर शेती आहे. भाऊ, वडील आदी सर्व जण त्यांना शेतीत मदत करतात. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी