शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बोगस बियाणे रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाचे १७ भरारी पथके स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:31 IST

बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या बोगस बिटी बियाणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचवेळी कृषी विभागाचे एक जिल्हास्तरीय आणि सोळा तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. बोगस बियाणे संदर्भात, साठवणूक आदी बाबत कृषी विभागाकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या बोगस बिटी बियाणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचवेळी कृषी विभागाचे एक जिल्हास्तरीय आणि सोळा तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. बोगस बियाणे संदर्भात, साठवणूक आदी बाबत कृषी विभागाकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळसह राज्यात मोठया प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच.टी. बी.टी. कापूस बियाणांची अवैधरित्या मोठया क्षेत्रावर लागवड झाल्याची बाब समोर आली होती.आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच गुजरात राज्यातून या बियाण्याचा पुरवठा झाल्याचेही उघडकीस आले होते. त्यामुळे हंगामात एच. टी. बियाणे अवैधरित्या शेतकºयांपर्यंत पोहचणार नाही, या करीता कृषी विभागामार्फत जिल्हा स्तरावर १ व तालुकास्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना केली आहे.क्षेत्रीय कर्मचाºयांच्या माध्यमातून जागृती अभियान राबविले जात आहे. तसेच शेतकºयांनी अवैध व पर्यावरण विरोधी एच.टी. बी.टी. कापूस बियाणे खरेदी करु नये व लागवड करु नये. जर एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री, साठवणूक, बुकींग बाबत माहिती प्राप्त झाल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ तसे कृषी विभागातील अधिकाºयांशी व पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधावा.शेतकºयांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये व संभाव्य नुकसान टाळण्याकीरता मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती कृषी व पशुसंवर्धन समितीचे रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी यांनी केले आहे.शेतकºयांनी ही खबरदारी घ्यावीखरीप हंगाम २०१८ मध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी खरेदी करताना शेतकºयांनी, गुणवत्ता व दर्जाची हमी देणाºया अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करा. पावतीवर शेतकºयांची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावत्या सांभाळून ठेवाव्यात. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन,पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुदत पाहून घ्या. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल,एस.एम.एस.,द्वारे कराव्यात. तक्रारी सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० वर संपर्क साधावा.

टॅग्स :MarketबाजारNandedनांदेड