शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सत्तेचे समान वाटप हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:04 IST

वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठीचा नाही. तर वंचित घटकांच्या विकासाची ही लढाई आहे. समाजातील ठरावीक घरांमध्ये सत्ता मर्यादित न ठेवता दुर्लक्षित जातसमूहांना सत्तेचा वाटा देण्यासाठी आमची ही धडपड सुरु आहे.

ठळक मुद्देअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर माळेगाव येथे ओबीसी सत्ता संपादन मेळाव्यात प्रतिपादन

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठीचा नाही. तर वंचित घटकांच्या विकासाची ही लढाई आहे. समाजातील ठरावीक घरांमध्ये सत्ता मर्यादित न ठेवता दुर्लक्षित जातसमूहांना सत्तेचा वाटा देण्यासाठी आमची ही धडपड सुरु आहे. राज्यात वंचित विकास आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीनंतर वर्षानुवर्षे सत्तेबाहेर ठेवलेला घटक सत्तेचा वाटेकरी झालेला दिसेल, अशा शब्दात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना विश्वास दिला.माळेगाव येथील कुस्ती मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित ओबीसी परिषद व सत्ता संपादन एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी आ. हरिभाऊ भदे, डॉ. संघरत्न कुºहे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फिरोज लाला, शिवानंद हैबतपुरे, डॉ. इंद्रकुमार भिसे, रामचंद्र येईलवाड, रमेश महाराज पोहरादेवीकर, डॉ. यशपाल भिंगे, जाकेर चाऊस, शिवाजी गेडेवाड, मोहन राठोड, नागनाथ पडवळकर, कॉ. गणपत भिसे, कुमार कुर्तडीकर आदींची उपस्थिती होती.वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएम पक्षाला सोबत का घेतले? असा प्रश्न काहींकडून विचारला जात आहे. या देशात ६०० वर्षे मुस्लिम समाजाची सत्ता होती. सत्तेत असताना मुस्लिम समाजाने कधी तुमचा व्यवसाय काढून घेतला का? त्यांनी जातीव्यवस्था आणली का? असा सवाल करीत जे आपल्याला मते देणार नाहीत तेच यांना का सोबत घेतले, त्यांना का सोबत घेतले? अशी विचारणा करीत असल्याचे सांगत मागील ७० वर्षांत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लढणारा एकतरी धनगर, एकतरी माळी विधिमंडळात गेला का? या समाजाची जी व्यथा आहे, तीच व्यथा छोट्या ओबीसी घटकांची असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांना खºया अर्थाने निवडून आणायचे असेल तर या छोट्या घटकांचीच साखळी उभी करावी लागणार असून, तेच काम या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी सांगितले.तलाकसारखी शिक्षा इतरांनाही मिळू शकतेशासनाने मुस्लिम धर्मियांत तलाक देणा-यांसाठी ७ वर्षांच्या शिक्षेचा कायदा आणला आहे. मुस्लिम समाजात तलाक म्हणजेच घटस्फोट देण्याचे प्रमाण १ टक्के आहे. तर इतर समाजात ते १२ टक्के असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. याप्रकरणी न्यायालयात दाद मागितल्यास एखाद्या गोष्टीसाठी केलेली शिक्षेची तरतूद त्याच कारणासाठी इतरांनाही लागू होऊ शकते, असे सांगत मुस्लिम समाजाला मोहरा बनवून इतर समाजाला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यावेळी म्हणाले. शिक्षणक्षेत्रातून दलित, वंचित, कष्टकरी समाजाला बाजूला ठेवले जात असल्याचेही ते म्हणाले.सर्वांनाच शिष्यवृत्ती देवूयंदाच्या वर्षी सर्व शाखांतील २५ टक्के जागा रिक्त राहिल्या. कारण, प्रवेश मिळूनही पैसे नसल्याने ओबीसी घटकातील विद्यार्थी अ‍ॅडमिशन घेऊ शकले नाहीत. तरुण आज बेरोजगार झाला आहे. वंचित आघाडीची सत्ता आल्यास एकाच देवस्थानातील तिजोरीतून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलियर शिष्यवृत्ती देवू.

टॅग्स :NandedनांदेडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकPoliticsराजकारण