शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

फुले-शाहू-आंबेडकरी विचार हे क्रांतीचे त्रिशरण- यशवंत मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:56 IST

देशात धार्मिक मुद्यांच्या आधारावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. त्या जिंकल्याही जात आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांच्या लोकांकडे संविधान हे मोठे हत्यार आहे. देशातील बहुजनांना एकत्र आणण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : देशात धार्मिक मुद्यांच्या आधारावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. त्या जिंकल्याही जात आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांच्या लोकांकडे संविधान हे मोठे हत्यार आहे. देशातील बहुजनांना एकत्र आणण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केला.

नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अर्थात गौरी लंकेश स्मृती परिसरात रमाई विचारमंचावर झालेल्या पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. नंदन नांगरे, डॉ. प्रकाश मोगले, डॉ. आदिनाथ इंगोले, स्वागताध्यक्ष अरुण दगडू, मुख्य संयोजक डॉ. हेमंत कार्ले, डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रशांत वंजारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मनोहर म्हणाले, देशात हिंदू राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी हिंदू धर्म हा प्रतिगाम्यांकडे सामर्थ्याचा मुद्दा आहे. याच मुद्यावर निवडणुकाही जिंकल्या जात आहेत. धर्माची समीक्षा करावी लागणारच आहे; पण त्याचवेळी आता पुरोगामी विचारांचा एकत्र येवून लढा उभारावा लागणार आहे. देशात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानातील साम्य व मतभेदाची चर्चा होते. हे विचार एकत्रित आणण्याबाबतही काही पातळीवर प्रयत्न होत आहेत. मात्र हे एकत्रिकरण सर्वांना बांधून ठेवणारे राहणार नाही. त्यामुळे क्रांतीसाठी आता एक नवा सिद्धांत तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुरोगाम्यांना आता संविधानाच्या बळावरच लढावे लागणार आहे. या देशात त्यांना पाठिंबाही मिळेल. पुरोगामींसाठी फुले-शाहू-आंबेडकर हे क्रांतीचे त्रिशरण आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण केले तरच त्यांना संविधानाशी नाते सांगता येईल, असे डॉ. मनोहर यांनी स्पष्ट केले. या आंबेडकरी विचारवेध संमेलनात ‘आंबेडकरवादाला अभिप्रेत असलेले पर्यायी जग’ या विषयावर कॉ. अण्णा सावंत, डॉ. वंदना महाजन, डॉ. अशोक गायकवाड यांनी विचार मांडले तर ‘आंबेडकरी चळवळ आणि जातीअंताची क्रांती’ याविषयी डॉ. अशोक पळवेकर, डॉ. प्रकाश राठोड यांनी विचार मांडले. ‘समाजवाद, सेक्युलॅरिझम आणि आंबेडकरवाद’ या विषयावर बोलताना डॉ. अन्वर राजन यांनी कोणतेही राष्ट्र हे धर्माधिष्ठित असू शकत नसल्याचे सांगितले. धर्मातीत अनेक बाबी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे आधुनिक राष्ट्र म्हणून उदयास येताना धर्माला बाजूला ठेवून विज्ञानाची कास धरावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अक्रम पठाण यांनीही विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. सतेश्वर मोरे होते.

कविसंमेलनास प्रमोद वाळके यांच्या गझलने प्रारंभ झाला. डॉ. डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे यांनी ‘गावकुसाबाहेरच्या बाया’ ही कविता सादर केली तर प्राचार्य यशवंत खडसे यांनी आरक्षण याविषयी आपली रचना सादर केली. अनिल कांबळे, हेमंतकुमार कांबळे, मोहन सिरसाठ, रमेश सरकाटे, जनार्धन मोहिते यांनी आपल्या रचना सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे यांनी एक दीर्घ कविता तसेच ‘पंख पसरेन म्हणते’ ही गेय कविता सादर केली. यावेळी उपस्थित कवींच्या आग्रहास्तव डॉ. यशवंत मनोहर यांनीही आपली ‘जपून रे माझ्या फिनीक्स पक्ष्यांनो खूप इथे आपला वध झाला आहे’ ही कविता सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. या संमेलनासाठी डी. टी. गायकवाड, साहेबराव पवार, संजय वाघमारे, मिलिंद राऊत, जयप्रकाश वनंजे, मिलिंद दरबारे, उत्तम तांबळे, डॉ. विलास ढवळे, मिलिंद ढवळे, अनुरत्न वाघमारे, दीपक सपकाळे, सुरेश वनंजे आदींनी परिश्रम घेतले.