शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फुले-शाहू-आंबेडकरी विचार हे क्रांतीचे त्रिशरण- यशवंत मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:56 IST

देशात धार्मिक मुद्यांच्या आधारावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. त्या जिंकल्याही जात आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांच्या लोकांकडे संविधान हे मोठे हत्यार आहे. देशातील बहुजनांना एकत्र आणण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : देशात धार्मिक मुद्यांच्या आधारावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. त्या जिंकल्याही जात आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांच्या लोकांकडे संविधान हे मोठे हत्यार आहे. देशातील बहुजनांना एकत्र आणण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केला.

नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अर्थात गौरी लंकेश स्मृती परिसरात रमाई विचारमंचावर झालेल्या पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. नंदन नांगरे, डॉ. प्रकाश मोगले, डॉ. आदिनाथ इंगोले, स्वागताध्यक्ष अरुण दगडू, मुख्य संयोजक डॉ. हेमंत कार्ले, डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रशांत वंजारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मनोहर म्हणाले, देशात हिंदू राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी हिंदू धर्म हा प्रतिगाम्यांकडे सामर्थ्याचा मुद्दा आहे. याच मुद्यावर निवडणुकाही जिंकल्या जात आहेत. धर्माची समीक्षा करावी लागणारच आहे; पण त्याचवेळी आता पुरोगामी विचारांचा एकत्र येवून लढा उभारावा लागणार आहे. देशात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानातील साम्य व मतभेदाची चर्चा होते. हे विचार एकत्रित आणण्याबाबतही काही पातळीवर प्रयत्न होत आहेत. मात्र हे एकत्रिकरण सर्वांना बांधून ठेवणारे राहणार नाही. त्यामुळे क्रांतीसाठी आता एक नवा सिद्धांत तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुरोगाम्यांना आता संविधानाच्या बळावरच लढावे लागणार आहे. या देशात त्यांना पाठिंबाही मिळेल. पुरोगामींसाठी फुले-शाहू-आंबेडकर हे क्रांतीचे त्रिशरण आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण केले तरच त्यांना संविधानाशी नाते सांगता येईल, असे डॉ. मनोहर यांनी स्पष्ट केले. या आंबेडकरी विचारवेध संमेलनात ‘आंबेडकरवादाला अभिप्रेत असलेले पर्यायी जग’ या विषयावर कॉ. अण्णा सावंत, डॉ. वंदना महाजन, डॉ. अशोक गायकवाड यांनी विचार मांडले तर ‘आंबेडकरी चळवळ आणि जातीअंताची क्रांती’ याविषयी डॉ. अशोक पळवेकर, डॉ. प्रकाश राठोड यांनी विचार मांडले. ‘समाजवाद, सेक्युलॅरिझम आणि आंबेडकरवाद’ या विषयावर बोलताना डॉ. अन्वर राजन यांनी कोणतेही राष्ट्र हे धर्माधिष्ठित असू शकत नसल्याचे सांगितले. धर्मातीत अनेक बाबी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे आधुनिक राष्ट्र म्हणून उदयास येताना धर्माला बाजूला ठेवून विज्ञानाची कास धरावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अक्रम पठाण यांनीही विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. सतेश्वर मोरे होते.

कविसंमेलनास प्रमोद वाळके यांच्या गझलने प्रारंभ झाला. डॉ. डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे यांनी ‘गावकुसाबाहेरच्या बाया’ ही कविता सादर केली तर प्राचार्य यशवंत खडसे यांनी आरक्षण याविषयी आपली रचना सादर केली. अनिल कांबळे, हेमंतकुमार कांबळे, मोहन सिरसाठ, रमेश सरकाटे, जनार्धन मोहिते यांनी आपल्या रचना सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे यांनी एक दीर्घ कविता तसेच ‘पंख पसरेन म्हणते’ ही गेय कविता सादर केली. यावेळी उपस्थित कवींच्या आग्रहास्तव डॉ. यशवंत मनोहर यांनीही आपली ‘जपून रे माझ्या फिनीक्स पक्ष्यांनो खूप इथे आपला वध झाला आहे’ ही कविता सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. या संमेलनासाठी डी. टी. गायकवाड, साहेबराव पवार, संजय वाघमारे, मिलिंद राऊत, जयप्रकाश वनंजे, मिलिंद दरबारे, उत्तम तांबळे, डॉ. विलास ढवळे, मिलिंद ढवळे, अनुरत्न वाघमारे, दीपक सपकाळे, सुरेश वनंजे आदींनी परिश्रम घेतले.