शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अनुभूती शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:02 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठाचे कुलसचिव रमजान मुलानी यांचे प्रतिपादन

नांदेड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अनुभूती शिबीर- संवाद ग्रामीण भागाचा सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ येथे तीन दिवशीय शिबीर झाले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात डॉ़ रमजान मुलाणी बोलत होते़ यावेळी संस्कृती संवर्धन मंडळाचे व्यवस्थापक अभिजित महाजन, मुख्याध्यपक संभाजी गायकवाड, नाना वाघमोडे अभाविप विभाग संघटनमंत्री, जिल्हा सहसंयोजक शुभम नार्तावार यांची प्रमुख उपस्थिती होती. विभाग संघटनमंत्री नाना वाघमोडे यांनी आगामी कार्यक्रमाची घोषणा केली़ यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक हजार वृक्ष गोदावरी नदीच्या काठावर लावणार असल्याचे सांगितले़ अभाविप स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व ठिकाणी रक्तदान शिबीर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले़या शिबिराची सुरुवात या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, मेजर बालाजी सूर्यवंशी, सुनील देशमुख, सरपंच सुजाता सिडनोड, प्रदेश सहमंत्री अंकिता कामटीकर, शिबीरप्रमुख नरेश यनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ दरवर्षी अभाविप एक थीम ठरवत असते. यावर्षी भारत गौरव ही संकल्पना घेऊन वर्षभर काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिरामध्ये उभारता भारत नई दिशाये या विषयावर डॉ. रामचंद्र मंठाळकर यांनी मांडणी केली. यावेळी त्यांनी भारतातील परंपरा यांची मांडणी केली.ग्रामविकास संकल्पना हा विषय दीपक मोरताळे यांनी मांडला. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपले गाव हे विकसित कोणत्या मागाने होईल ते त्यांनी सांगितले.जनजागृतीपर मार्गदर्शनपाणी व्यवस्थापन कसे करावे या विषयी सखोल मार्गदर्शन व चर्चा झाली. नागदरवाडी येथे पाणी विषयासाठी ज्यांनी आयुष्य घातले ते बाबूराव केंद्रे यांनी घेतले. पाण्याविषयी जनजागृती व महत्त्व लोकांना पटवून दिले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड