शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

अनुभूती शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:02 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठाचे कुलसचिव रमजान मुलानी यांचे प्रतिपादन

नांदेड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अनुभूती शिबीर- संवाद ग्रामीण भागाचा सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ येथे तीन दिवशीय शिबीर झाले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात डॉ़ रमजान मुलाणी बोलत होते़ यावेळी संस्कृती संवर्धन मंडळाचे व्यवस्थापक अभिजित महाजन, मुख्याध्यपक संभाजी गायकवाड, नाना वाघमोडे अभाविप विभाग संघटनमंत्री, जिल्हा सहसंयोजक शुभम नार्तावार यांची प्रमुख उपस्थिती होती. विभाग संघटनमंत्री नाना वाघमोडे यांनी आगामी कार्यक्रमाची घोषणा केली़ यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक हजार वृक्ष गोदावरी नदीच्या काठावर लावणार असल्याचे सांगितले़ अभाविप स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व ठिकाणी रक्तदान शिबीर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले़या शिबिराची सुरुवात या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, मेजर बालाजी सूर्यवंशी, सुनील देशमुख, सरपंच सुजाता सिडनोड, प्रदेश सहमंत्री अंकिता कामटीकर, शिबीरप्रमुख नरेश यनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ दरवर्षी अभाविप एक थीम ठरवत असते. यावर्षी भारत गौरव ही संकल्पना घेऊन वर्षभर काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिरामध्ये उभारता भारत नई दिशाये या विषयावर डॉ. रामचंद्र मंठाळकर यांनी मांडणी केली. यावेळी त्यांनी भारतातील परंपरा यांची मांडणी केली.ग्रामविकास संकल्पना हा विषय दीपक मोरताळे यांनी मांडला. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपले गाव हे विकसित कोणत्या मागाने होईल ते त्यांनी सांगितले.जनजागृतीपर मार्गदर्शनपाणी व्यवस्थापन कसे करावे या विषयी सखोल मार्गदर्शन व चर्चा झाली. नागदरवाडी येथे पाणी विषयासाठी ज्यांनी आयुष्य घातले ते बाबूराव केंद्रे यांनी घेतले. पाण्याविषयी जनजागृती व महत्त्व लोकांना पटवून दिले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड