शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

अनुभूती शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:02 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठाचे कुलसचिव रमजान मुलानी यांचे प्रतिपादन

नांदेड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अनुभूती शिबीर- संवाद ग्रामीण भागाचा सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ येथे तीन दिवशीय शिबीर झाले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात डॉ़ रमजान मुलाणी बोलत होते़ यावेळी संस्कृती संवर्धन मंडळाचे व्यवस्थापक अभिजित महाजन, मुख्याध्यपक संभाजी गायकवाड, नाना वाघमोडे अभाविप विभाग संघटनमंत्री, जिल्हा सहसंयोजक शुभम नार्तावार यांची प्रमुख उपस्थिती होती. विभाग संघटनमंत्री नाना वाघमोडे यांनी आगामी कार्यक्रमाची घोषणा केली़ यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक हजार वृक्ष गोदावरी नदीच्या काठावर लावणार असल्याचे सांगितले़ अभाविप स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व ठिकाणी रक्तदान शिबीर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले़या शिबिराची सुरुवात या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, मेजर बालाजी सूर्यवंशी, सुनील देशमुख, सरपंच सुजाता सिडनोड, प्रदेश सहमंत्री अंकिता कामटीकर, शिबीरप्रमुख नरेश यनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ दरवर्षी अभाविप एक थीम ठरवत असते. यावर्षी भारत गौरव ही संकल्पना घेऊन वर्षभर काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिरामध्ये उभारता भारत नई दिशाये या विषयावर डॉ. रामचंद्र मंठाळकर यांनी मांडणी केली. यावेळी त्यांनी भारतातील परंपरा यांची मांडणी केली.ग्रामविकास संकल्पना हा विषय दीपक मोरताळे यांनी मांडला. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपले गाव हे विकसित कोणत्या मागाने होईल ते त्यांनी सांगितले.जनजागृतीपर मार्गदर्शनपाणी व्यवस्थापन कसे करावे या विषयी सखोल मार्गदर्शन व चर्चा झाली. नागदरवाडी येथे पाणी विषयासाठी ज्यांनी आयुष्य घातले ते बाबूराव केंद्रे यांनी घेतले. पाण्याविषयी जनजागृती व महत्त्व लोकांना पटवून दिले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड