शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा लोकप्रतिनिधी गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

संघर्षशील व्यक्तिमत्त्व गमावल्याचे दु:ख - अशोक चव्हाण खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी अंतापूरकर यांच्या रूपाने गमावला आहे. त्यांचे ...

संघर्षशील व्यक्तिमत्त्व गमावल्याचे दु:ख - अशोक चव्हाण

खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी अंतापूरकर यांच्या रूपाने गमावला आहे. त्यांचे अकाली निधन धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढत होते; परंतु ते संघर्षशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अनेकदा खडतर परिस्थितीवर मात केली. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती; परंतु दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले. अंतापूरकर हे मनमिळाऊ, तसेच संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलीकडचे होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाने मी सहकारीच नव्हे, तर एक कौटुंबिक स्नेही गमावल्याचे सांगत चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मितभाषी आणि शांत स्वभावाच्या लोकप्रतिनिधीला मुकलो- खा. चिखलीकर

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. अत्यंत शांत स्वभाव, तसेच स्वच्छ चारित्र्य, मितभाषी असलेले हे व्यक्तिमत्त्व देगलूर-बिलोलीकरांच्या विकासासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. अंतापूरकर परिवारावर कोसळलेल्या दु:खात चिखलीकर परिवार, तसेच जिल्हा भारतीय जनता पार्टी सहभागी असल्याचे सांगत चिखलीकर यांनी रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

साधा-सरळ राजकारणी गमावला- भास्करराव पाटील

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने साधी राहणी आणि सरळ विचारसरणी असलेले नेतृत्व गमावल्याचे दु:ख असल्याचे माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी म्हटले आहेत. अंतापूरकर हे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणारे नेते होते. अंतापूरकर यांचा तसा राजकीय पिंड नव्हता. ते वीज मंडळात अभियंता होते. २००९ मध्ये देगलूर मतदारसंघ राखीव झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या मतदारसंघासाठी उमेदवार निवड करण्यासाठी व निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. अंतापूरकर हे या मतदारसंघाच्या विकासासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.