शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा लोकप्रतिनिधी गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

संघर्षशील व्यक्तिमत्त्व गमावल्याचे दु:ख - अशोक चव्हाण खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी अंतापूरकर यांच्या रूपाने गमावला आहे. त्यांचे ...

संघर्षशील व्यक्तिमत्त्व गमावल्याचे दु:ख - अशोक चव्हाण

खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी अंतापूरकर यांच्या रूपाने गमावला आहे. त्यांचे अकाली निधन धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढत होते; परंतु ते संघर्षशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अनेकदा खडतर परिस्थितीवर मात केली. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती; परंतु दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले. अंतापूरकर हे मनमिळाऊ, तसेच संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलीकडचे होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाने मी सहकारीच नव्हे, तर एक कौटुंबिक स्नेही गमावल्याचे सांगत चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मितभाषी आणि शांत स्वभावाच्या लोकप्रतिनिधीला मुकलो- खा. चिखलीकर

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. अत्यंत शांत स्वभाव, तसेच स्वच्छ चारित्र्य, मितभाषी असलेले हे व्यक्तिमत्त्व देगलूर-बिलोलीकरांच्या विकासासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. अंतापूरकर परिवारावर कोसळलेल्या दु:खात चिखलीकर परिवार, तसेच जिल्हा भारतीय जनता पार्टी सहभागी असल्याचे सांगत चिखलीकर यांनी रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

साधा-सरळ राजकारणी गमावला- भास्करराव पाटील

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने साधी राहणी आणि सरळ विचारसरणी असलेले नेतृत्व गमावल्याचे दु:ख असल्याचे माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी म्हटले आहेत. अंतापूरकर हे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणारे नेते होते. अंतापूरकर यांचा तसा राजकीय पिंड नव्हता. ते वीज मंडळात अभियंता होते. २००९ मध्ये देगलूर मतदारसंघ राखीव झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या मतदारसंघासाठी उमेदवार निवड करण्यासाठी व निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. अंतापूरकर हे या मतदारसंघाच्या विकासासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.