शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पार्डी-देळूब पुलामुळे होणार शेतकऱ्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:04 IST

अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़

ठळक मुद्देपावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार पूल

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़ हा पूल पावसाळ्याअगोदर वाहतुकीसाठी खुला होणार आहे़ हा पूल पावसाळ्यात देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी परिसरातील शेतकऱ्यांना मालाची ने-आण करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे़देळूब गावाला जोडणारा पूल मोडकळीस आलेला होता़ पावसाळ्यात हा पूल वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात होती़ पुलावर सुरक्षेसाठी कठडे नसल्याने या पुलावर नेहमीच अपघात होत होते़ तसेच पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहत होते़ त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती़ या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या पुलावरील दळणवळण व्यवस्था संपूर्ण ठप्प होत होती़देळूब गावाच्या पुलावरून शेतकºयाच्या मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने पावसाळ्यात शेतकºयांना अनेक गोष्टींचा अडथळा निर्माण होत होता़ तसेच या गावांना दुसरा मार्ग नसल्याने हाच पूल नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी होता़ त्यामुळे या पुलावर नेहमीच वर्दळ राहत असे़ परंतु, हा पूल संपूर्ण मोडकळीस आल्याने गावकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असे़या पुलाच्या बांधकामासाठी गावकºयांनी व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी मागणी करून केली होती़ शासनाने देळूब पुलाच्या बांधकामाची परवानगी दिली होती़ या पुलाचे बांधकाम जानेवारी महिन्यात सुरु झाले होते़ पुलाचे बांधकाम पूर्ण प्रगतीपथावर सुरू आहे़ पुढील महिन्यात पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कामगार रात्रं-दिवस काम करीत आहे़ दरम्यान, इसापूर धरणातून महिन्याच्या अंतराने पार्डी नदीला पाणी सोडण्यात येत असल्याने बाधकामास व्यत्यय येत असून पुलाच्या बांधकामास उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे़पुलाचे बांधकामुळे देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी शिवारातील शेतकºयांना दिलासा मिळणार आहे़ या पुलाच्या बांधकामुळे पावसाळ्यात होणाºया अनेक अडचणीचा सामना करावा लागणार नाही़ विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग सोयीस्कर पडेल़ देळूब ,भोगाव येथील जि़ प़ शाळा नावालाच असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते़ पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले होते़ परंतु, पुलाचे बांधकाम केल्याने विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीस्कर होणार आहे.एकमेव पूलदेळूबच्या पुलावरून शेतकºयाच्या मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते, मात्र पावसाळ्यात अडचणीचा समना करावा लागत होता़ या गावांना दुसरा मार्ग नसल्याने हा पूल एकमेव होता़ त्यामुळे पुलावर नेहमीच वर्दळ राहत असे़ पूल संपूर्ण मोडकळीस आल्याने गावकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असे़पुलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार सोयपुलाचे बांधकामामुळे देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी शिवारातील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे़ या पुलाच्या बांधकामामुळे पावसाळ्यात होणा-या अनेक अडचणीचा सामना करावा लागणार नाही़ विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग सोयीस्कर पडेल़ पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते़ परंतु, पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले होते़ परंतु, या पुलाचे बांधकाम केल्याने विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीस्कर होणार आहे़

टॅग्स :Nandedनांदेडroad transportरस्ते वाहतूक