शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव, तुरीवर जात आहेत वाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ...

यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी सर्वच पीक हातचे गेले. कडाक्याच्या थंडीत तूर पीक बहरले होते. उत्पादन चांगले होईल, अतिपावसाने झालेली नुकसान तूर भरून काढेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून होता. मात्र, अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव हिमायतनगर तालुक्यातील सर्वच भागात झाल्याने उभी तूर वाळून जात आहे. या रोगावर सध्या उपायोजना होत नसल्याने चांगल्या स्थितीत तुरीचे पीक आले असताना मर रोगामुळे हिरावून नेत आहे. यंदा खरिपातील सर्वच पिकांनी दगाफाटा दिल्याने पेरणी खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

कृषी क्षेत्रातील जानकारांच्या मते मर रोग फुले येण्यापूर्वीच आला तर १०० टक्के नुकसान होते, तसेच शेंगा झाडावर पक्व होत असताना रोग आल्यास उत्पादनात ३० टक्के घट होत असते. आजघडीला तूर पीक फुलोरा व कोवळ्या शेंगा धारणेच्या मोसमात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.