शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘एफडी’ची रक्कम देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:10 IST

एफडी बॉण्ड केलेली रक्कम मिळत नसल्याची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे प्राप्त झाली होती. अखेर मुद्दल भरणा केलेली व त्यावरील रक्कम खातेदारास देण्यात यावी

ठळक मुद्देहिंगोली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच

हिंगोली : एफडी बॉण्ड केलेली रक्कम मिळत नसल्याची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे प्राप्त झाली होती. अखेर मुद्दल भरणा केलेली व त्यावरील रक्कम खातेदारास देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक न्याय मंचने संबंधित मल्टीस्टेट बँकेला दिले आहेत.जिल्हाभरात सध्या गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास संबंधित संस्था टाळाटाळ करत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. असेच एक प्रकरण वसमत तालुक्यातील आहे. वसमत येथील माधुरी भास्करराव अलसटवार या गृहिणीने विघ्नहर मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटी लि. शाखेत १६ सप्टेंबर २०१३ रोजी १ लाख रुपयांचा एफडी बॉण्ड केला होता. सदर रक्कम ही १६ सप्टेंबर २०१६ रोेजी १ लाख १२ हजार रूपये याप्रमाणे बँकेकडून मिळणार होती. परंतु बँकेत रोकड नसल्याने रक्कम मिळत नाही. त्यामुळे काही कालावधीनंतर रक्कम मिळेल असे आश्वासन तक्रारदार माधुरी अलसटवार यांना बँकेकडून मिळाले. त्यानंतर १९ डिसेंबर २०१७ रोजी परत सदर महिलेने एफडीच्या रक्कमेची मागणी केली. परंतु वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याने माधुरी अलसटवार यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हा खटला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात चालला. दोन्हीकडील युक्तीवादानंतर माधुरी अलसटवार यांना बँकेचे शाखा व्यवस्थापक व कार्याध्यक्ष यांनी संयुक्तीक अथवा वैक्तीकरित्या तक्रारदार महिलेस १ लाख १२ हजार रूपये रक्कम देय दिनांकापासून पुढे ४ टक्के दराने पूर्ण देयी पर्यंतच्या काळाकरीता व्याज आकारून द्यावी. तसेच तक्रादार महिलेस शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने १ हजार रूपये, तक्रारीचा खर्च ५०० रूपये देण्याचे आदेश ६ डिसेंबर २०१८ रोजी न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी, सदस्या एन. के. कांकरीया यांनी दिले.एटीएममधून रोकड निघालीच नाहीहिंगोली तालुक्यातील खानापूर येथील नारायण चंद्रकांत जाधव यांचे इलाहाबाद बँकेत खाते आहे. बँकतर्फे त्यांना एटीएम कार्डही दिले होते. जाधव हे १३ आॅक्टोबर २०१७ रोजी इलाहाबाद शाखेच्या एटीएम मशिनमधून ५ हजार रूपये काढण्यासाठी गेले होते. यावेळी मशिनमध्ये सर्व्हर डाऊन असा मजकूर होता. परंतु काही वेळाने जाधव यांच्या मोबाईलवर खात्यातील ५ हजार रुपये वजा झाल्याचा संदेश आला. याबाबत जाधव यांनी बँक व्यवस्थापकांना माहिती दिली. त्यानंतर ७२ तासांपर्यंत खात्यावरील वजा झालेली रोकड परत जमा होईल, असे सांगण्यात आले. परंतु रक्कम जमा झालीच नसल्याने जाधव यांनी ग्राहक न्याच मंचाकडे तक्रार दाखल केली. अखेर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी यांनी तक्रारकर्त्यास शाखा व्यवस्थापक यांनी ५ हजार रूपये, शारीरिक मानसिक त्रासापाई १ हजार व तक्रारीचा खर्च १ हजार पंधरा दिवसांत देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMONEYपैसा